Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हुतात्म्याच्या समर्पणातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- साध्वी किरणसुधाजी महाराज

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 14, 2022
in Uncategorized, महाराष्ट्र
0 0
0
हुतात्म्याच्या समर्पणातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- साध्वी किरणसुधाजी महाराज
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड प्रतिनिधी

बीड:- सहनशीलतेच्या पलीकडे गेलेली परिस्थिती जेव्हा संघर्षाची प्रेरणास्त्रोत होते, चेहरा नसलेली साधारण माणसं जेव्हा त्यांच्या नाकारलेल्या अस्तित्वासाठी पेटून उठतात. त्याग, समर्पण आणि हौतात्म्य ही जेव्हा सामान्य माणसाची जीवनशैली होते व त्यातूनच हुतात्माच्या समर्पणातून मिळालेल्या स्वातंत्र्याची आज प्रकर्षाने आठवण येते. पाहता-पाहता 75 वर्षाचा काळ लोटला जातो आणि त्याच आठवणीची स्मृति पटलावर नोंद होते, त्या आठवणीच्या संचारात माणूस भारावला जातो. असेच वातावरण आज अमृत मंगल कार्यालयात होते.

विषय होता देशाचे साजरे होणारे75 वे स्वातंत्र्य अमृत महोत्सव. यासंदर्भात पूज्य किरणसुधाजी म्हणाल्या, हुतात्मा समर्पित देशासाठी झाला मात्र त्यांनी आंदोलन अहिंसेच्या मार्गाने केले. देश त्यांनी स्वतंत्र केला. देश पारतंत्र्यातून मुक्त झाला तसा आत्मा हा कर्माच्या बेडीतून देहात बंदिस्त झाला आहे, त्यालाही मुक्त करणे आद्य कर्तव्य असून त्यासाठी धर्म आराधनेतून उठाव करावयाचा आहे. नामस्मरणातून जयघोष करावा लागणार आहे म्हणून परमेश्वराची ओळख करायची आहे. कारण या जन्ममृत्यूच्या चक्रात संसार रुपी नौका आडकलेली आहे. आपण त्या नौकेत अडकलेलो आहोत. भगवंताच्या सारथ्यातून ही नौका मुक्त करायची आहे. भगवंत केवळ आपणास त्यातून तारणार आहे. याच भगवंताला केवळ ज्ञान मिळविण्याला साडेबारा वर्षाच्या तपस्यातून अवधी लागला होता. आज त्याच ज्ञानाच्या उपदेशाने आत्म्याला मुक्त करायचे आहे असे त्यांनी सांगितले.

या प्रवचनापूर्वी पूज्य प्रणवमुनींनी आपले विचार मांडले. ते म्हणाले भगवान महावीरांच्या आचरणाविषयी असणार्‍या आचरांग सुत्रात त्यांनी सांगितले की, मुळाशिवाय वृक्षाला आधार नाही, पायाशिवाय घराला मजबुती नाही तसेच योग्य त्या आचरणाशिवाय माणसालाही सुधारणा नाही. सुधारल्यावरच अहिंसेची स्मृती होते. अहिंसा ही केवळ हिंसा करण्यापूर्ती मर्यादित नाही तर ती करता करविता आणि करून घेणारा यांना ही दोषी ठरवते. तिच्या आकलनाने माणूस सुधारतो व सत्कर्माला लागतो, त्यातून आपव्यय व वेळेची बचत होते. असा वेळेचा सदुपयोग करण्यासाठी हा चातुर्मास पर्व आहे. आपण बुद्धिवान आहात, समजूतदार आहात, आपल्या शक्तीचा वापर सत्संगातून, धार्मिक क्रियेतून अध्यात्मालाच आपण करणार आहात. या कार्याला उच्च-नीच, राव-रंक लागत नाही. जीवन प्रत्येकाला जगावे लागते. जीवनाला सुधारणे म्हणजे आत्म्याला सुधारणे होय. रोगाची ओळख झाल्यावर औषधी न मिळणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण होय तत्वत: गुणदोष ओळखून दोषाचे पारिपत्य न करणे म्हणजे आज नाहीतर उद्याही आपणाला आत्म्याला पेचात टाकने होय. म्हणून परमेश्वराला शरण येऊन इंद्रियाच्या सामर्थ्याने आत्म्याची संभावना करणे आवश्यक होय असे त्यांनी सांगितले.

जैन समाजा विषयी असणारी मुंडे परीवाराची आज नीष्टा दिसुन आली पुर्वी गोपीनाथराव मुंडे ही जैनांच्या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित रहात त्याच संस्कारात आज बीडच्या खासदार डॉक्टर प्रितम ताई मुंडेही चातुर्मास दरबारात अमृत मंगल कार्यालयात साधू साध्वींची दर्शन घेण्यासाठी आल्या त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले व आपल्या मनोगतात त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संतांचे मार्गदर्शन मिळाले व आजही त्यांच्या उपदेशाची गरज असल्याचे सांगीतले प्रवचणा पश्चात खासदारांसमवेत साधु, साध्वीनी अमृत महोत्सवातील निघालेल्या पदमात्रेत चालून देशाप्रती असणारी आपलीत्यांनी निष्ठा दाखवली.

Previous Post

बीड जिल्ह्यात भीषण अपघात सहा ठार; लग्नसोहळ्यास निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला.

Next Post

शिवसंग्राम चे संस्थापक माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शिवसंग्राम चे संस्थापक माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

शिवसंग्राम चे संस्थापक माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In