कवियत्री मयुरी कांबळे, टेंभरे
दारोदारी लागला तिरंगा
सुरु झाल अमृत महोत्सव
स्वांत्रत मिळुन 75 वर्ष झाले
आता कुठे तिरंगे लागले..
काय मिळाल, काय नाही
कसल विकास, उन्नति
देशात अजुनही दिसते गरीबी
तरी स्वांत्रत मिळुन दिले महापुरुषानी..
आता तरी राजकारण बंद करावे
गरीबाना अन्न, वस्त्र,निवारा मिळावे
सर्व लोक,समाज आपलच समजुन
देशाचा विकासात एकत्र यावे..
बेरोजगारी देशातुन काढून टाकावे
रोजगाराचे नवनवीन उपक्रम राबवावे
सर्वाना शिक्षण, हर घर शिक्षण करुन
देशाचा मान, गर्व शिखरा इतके मोठे करावे..
जातपात, उच्च -निच्च ही भावना
सोडुन हम सब एक भारतीय म्हणून
स्वताचा,देशाचा उन्नतीत हात पुढे
करुन असे करुणामय जिवन जगावे..
असा आराखडा तयार करावे
सर्वाना स्वांत्रत जगण्याच हक्क मिळावे
हर घर विकास, हर व्यक्ति रोजगार अस
घडवून भारत देशाच नाव अमर करावे..
दारोदारी लागला तिरंगा
सुरु झाल अमृत महोत्सव
स्वांत्रत मिळुन 75 वर्ष झाले
तरी आता कुठे तिरंगे लागले…