सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर:- २६ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दलाच्या वाहनावर नक्षल्यांनी आयईडी हल्ला केला असून यामध्ये ११ जवान शहीद झाले आहेत.
भारतमातेच्या शूर सुपुत्रांचे सर्वोच्च बलिदान देशाच्या स्मरणात सदैव अमर राहिल. की ती वेदनादायक घटना देश विसरनार नाही. या सर्व शहीद विर जवानांना युवक कांग्रेस कडून स्थानिक नगरपालिका चौक बल्लारपुर येथे कॅण्डल लावून फुल अर्पण करून ५ मिनिटाचे मोन धारण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उपस्थित नागरिकांनी शहीद जवान अमर रहे ..! अमर रहे..! वीर जवान अमर रहे ..! या जय घो ने नारे लवण्यात आले.यावेळी प्रदेश युवक कांग्रेस सहसचिव चेतन गेडाम, पूर्वनगरसेवक पवन मेश्राम, यु.का अध्यक्ष जुनैद सिद्दीकी, शंकर महाकाली,विकास श्रीवास, शहर अध्यक्ष यु.का अरविंद वर्मा,अजय रेड्डी,सुनील मोतीलाल,रूपेश भोयर, राकेश केशकर, प्रांजल बालपांडे,रवि जैस्वाल, मोहम्मद अकरम, बशीर सिद्दीकी, भीम वर्मा, रोशन ढेगळे, राहुल वर्मा, सूरज अहिकवार, अनस सिद्दीकी, पवन चौहान,रवि वर्मा, सूरज गैरवार, संजय घुगलोत, सुशील लिंगाला, सुमित परमार, पवन कलवला, अमन केसकर, शेटी अम्बाला, राज वर्मा, साहिल सिद्दिकी उपस्थित होते.