Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

वाहतुकीचा कळंबा होऊ नये म्हणून भर पावसात निगडी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करीत बजावले कर्तव्य!

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 5, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वाहतुकीचा कळंबा होऊ नये म्हणून भर पावसात निगडी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करीत बजावले कर्तव्य!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अँथनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी, दि. 4 मे:- पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना आपण नेहमीच पाहत असतो उन असो कि पाऊस कर्तव्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमी धावून जात असतात. अनेकदा त्यांच्या या कर्तव्य दक्षतेचे व्हिडिओ अथवा फोटो त्यांच्या नकळत कोणीतरी काढतो आणि ते व्हायरल करतो. असाच एक फोटो आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱी यांचा वायरल झाला आहे. या व्हायरल फोटोचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. व्हायरल फोटोमध्ये भर पावसात महिला पोलीस अधिकारी रस्त्याच्या कडेला पाणी तुंबलेल्या ठिकाणी छत्री घेऊन उभे आहे. तर पोलीस कर्मचारी हातामध्ये झाडाची फांदी घेऊन सासलेल्या पाण्याचा मार्ग करून देत आहे. या फोटो बाबत अधिक माहिती घेतली असता हा फोटो प्राधिकरण निगडी भागातील असल्याचे दिसून आले. फोटोमधील महिला अधिकारी यांचे नाव विजया कारंडे आहे तर दीपक तांदळे असे दुसरे पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहे. विजया कारंडे या निगडी येथे वाहतूक विभागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहे.

सविस्तर माहिती अशी की पिंपरी चिंचवड शुक्रवार (ता.४) रोजी सायंकाळी सहा वाजण्याची सुमारास मुसळधार पाऊस झाला. दहा ते वीस मिनिटांच्या कालावधी वादळी वाऱ्यासह बसलेल्या या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले. रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले तर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा झाला नसल्यामुळे जागोजागी पाण्याची मोठी मोठी डबकी साचली, गटारी, नाले, चेंबर तुबंले या दरम्यान निगडी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे व पोलीस कर्मचारी दीपक तांदळे हे सायंकाळी निगडी प्राधिकरण आकुर्डी रेल्वे स्टेशन मार्गे पेट्रोलिंग करीत असताना, तिथे रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पावसाची पाणी साचले असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे वाहन चालवताना अडचण निर्माण होऊन वाहतुकीला खोळंबा होऊ शकतो. वाहतूक कोंडी होऊ शकते हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी पावसाने देखील जोर धरला होता त्यांनी कोणताही क्षणाचाही विलंब न करता पोलीस कर्मचारी दीपक तांदळे यांच्या मदतीने साचलेल्या पाण्याचा निचरा केला. विशेष बाब म्हणजे यावेळी त्यांच्याकडे कोणतेही साधन सामग्री उपलब्ध नव्हती. केवळ झाडाच्या एका फांद्यांनी पाण्याला वाट करून दिली.

गेल्या आठवडभर हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज पिंपरी चिंचवडला झोडपून काढले. त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. उन्हाळ्यामुळे हैराण झालेले पिंपरी चिंचवडकर यांना या अवकाळी पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे .वाहतुकीचा खोळंबा होऊ नये ,म्हणून अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले कर्तव्य पार पाडले.

माझे काम नाही हे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे काम आहे. महापालिका प्रशासन जबाबदार आहे. असा कांगावा करून नेहमी हात वर करणाऱ्याच्य डोळ्यात अंजन घालणारे आजचे हे उदाहरण आहे. पदाचा तसेच अधिकाराचा गर्व न बाळगता केवळ नागरिकांना त्रास होऊ नये या भावनेपोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे आणि पोलीस कर्मचारी दीपक तांदळे यांनी आपले कर्तव्य बजावले.

Previous Post

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुध्द जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Next Post

बल्लारपूर शहरात भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने पाच विहारतील धम्म उपासिका शिबिर संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर शहरात भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने पाच विहारतील धम्म उपासिका शिबिर संपन्न.

बल्लारपूर शहरात भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने पाच विहारतील धम्म उपासिका शिबिर संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In