✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील चाणकी ते खड्का चारमंडळ प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत 7 किलो मिटरच्या रस्त्याचे डांबरीकरण काम चालू असुन या रस्त्याचे मुळ किंमत 4 कोटी रुपयांचे आहे तरी सुध्दा या रोडचे सुरवाती पासुनच कामात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप चानकीचे उपसरपंच अतुल पन्नासे यांनी केला आहे. तरी काम चालू आहे या रस्तामधे गिट्टी मुरूम कमी वापरण्यात आलेला आहे व माती जास्ती प्रमाणात वापर करण्यात येत आहे तरी सुध्दा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनचे इंजिनिअर डेकाटे पाऊण चालले जातात पण ठेकेदारानवर करवाई का होत नाही असे की तुम्ही हि माती या रोड मधे कसे काय टाकून निकृष्ट दर्जाचे काम पाहून सुद्धा निकृष्ट दर्जाचे कामाला रोखण्यासाठी असमर्थ काय आहे. की तुम्ही पण खा आणि आम्ही पण खाऊ असे गावातील लोका मध्ये चर्चा सुरू झाली आहे। आम्लाला चाणकी गावकऱ्यांना असे वाटते कि या रोड ठेकेदारानवर करवाई व्हावी आणि आम्हांला न्याय मिळावा उपसरपंच अतुल पन्नासे चाणकी
वर्धा जिल्हातील खडका- चारमंडळ- चानकी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. रस्ता काम संथगतीने सुरू असून, कामात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप चानकीचे उपसरपंच अतुल पन्नासे यांनी केला आहे. चानकी -चारमंडळ- खंडका हा साडेसात किमी अंतराचा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर झाला आहे. या रस्ता कामासाठी शासनाने साडेचार कोटींची तरतूद केली आहे. मात्र, कंत्राटदार आपल्या मर्जीने रस्ता तयार करीत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात आला. शासकीय अधिकारी या कामाकडे
कानाडोळा करीत असल्याची बाब ही निदर्शनास आल्याने पाणी मुरत असल्याची बाब लपून
राहिलेली नाही, असेही अतुल पन्नासे यांनी सांगितले.
प्रत्येक कामाची मुदत दिली जाते. मात्र, मुदत संपूनही काम पूर्णत्वास झाले नाही. रस्त्याच्या कामात मातीचावापर करण्यात आलेला आहे. नुकताच काही दिवसांवर पावसाळा सुरू होणार
आहे. यात वाहनचालकांसह गावातील शेतकरी लोकाना त्रास होणार आहे हा मार्ग सर्वांसाठी जवळचा असून, मोठ्या प्रमाणावर तिन्ही गावचे
शेतकरी या मार्गाशी जुळलेले आहे.हा रोड सिमेंट आणि डांबरी असून,गावातील मार्गावरील
नालीचे सुद्धा काम बाकी आहे. या रोडचे काम चारमंडळपासून सुरू झाले आहे. यापूर्वी खडका ते चारमंडळपर्यंतच्या रस्त्याचे कामही पूर्ण झालेले नाही. अपूर्ण कामामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचा दर्जा चांगला राहील, याकडे संबंधित विभागाच्या अभियंत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. लवकरात लवकर रस्ता तयार करण्याची मागणी उपसरपंच अतुल पन्नासे, सदस्य विशाल हेपट यांनी केली आहे.

