✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मोबा.न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- भारत राष्ट्र समिती चे नेते डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट समुद्र पुर सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रात जोरदार सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. यावेळी भारत राष्ट्र समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या सदस्य नोंदणी अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते आहे. आज तिसऱ्या टप्यातील नोदणी अभियानाला सिन्दी रेल्वेतुन सुरुवात करण्यात आली.
यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पूतळाला माल्यार्पण करून अब की बार किसान सरकार हा नारा देऊन तिसऱ्या टप्पाचा सभासद नोदणीला सुरवात करून माहीती पुस्तके, पोस्टर दुकाना दुकानात वाटप करण्यात आले. भारत राष्ट्र समिती आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा व लोकसभा 48 जागा लढविनार आहे, तसेच गावा गावात जाऊन भारत राष्ट्र समितीचे सदस्य बनवायचे व त्यातुनच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद सर्व जागा लढविनार आहे. त्या मुळे शेतकरी वर्गाने विचार करून भारत राष्ट्र समिती सदस्य मोहीमेत भाग घेवून सदस्य बनावे असे आव्हान यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते डॉ. उमेश वावरे यांनी केले.
यावेळी या सदस्य नोंदणी अभियानातील गावातून मोहीमे सोबत, मनिष नांदे, मनिष कांबळे, राहुल मुन, ज्ञानेश्वर वरघने, चारू आटे, दिलीप कांबळे, भिमराव फूलमाळी, दिलीप विहितकर, कोयल धवणे सह अनेक कार्यकते उपस्थिति होते.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348