✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यात वडनेर गावा जवळच्या दोंडुर्डा ग्रामपंचायत येथे वना नदीवरून असलेल्या विहिरीच्या माध्यमातून दोंडुर्डा ग्रामपंचायतच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या परिस्थितीमध्ये वडनेर ग्रामपंचायतला मिळालेल्या शासकीय योजनेच्या अंतर्गत वना नदीच्या काठावरून शासन मान्यतेनुसार दोन विहिरीचे बांधकाम सुरू असून पूर्णत्वास येऊन काम वेगाने सुरू आहे यासाठी शासनाद्वारे 9 करोड रुपयाचे नियोजन करण्यात आलेले आहे परंतु यांमुळे दोंडुर्डा ग्रामपंचायतच्या तक्रारीनुसार दोंदुडा गावालान वडनेर ग्रामपंचायतीच्या वतीने वना नदीच्या काठावर निर्माण करण्यात आलेल्या विहिरीमुळे दोंडुर्डा गावाला पाणीपुरवठा विहिरीचे पाणी तळाशी गेलेले असल्यामुळे दोंडुर्डा गावाला पाणी समस्या भेडसावत आहे.
दोंडुर्डा ग्रामपंचायतच्या वतीने उपअभियंता हिंगणघाट, गट विकास अधिकारी, तहसीलदार हिंगणघाट, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, तथा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्राद्वारे दोंडुर्डा ग्रामपंचायतच्या वतीने या तक्रारीत असे नमूद केलेले आहे की ग्रामपंचायत 1960 नुसार ही बाब शासनाने शासकीय नियमाला तिलांजली देत महाराष्ट्र ग्रामपंचायत 1960 च्या कायद्याचं भंग करणारी असल्याचे दोंदुडा ग्रामपंचायतीचे मत आहे. दोंडुर्डा ग्रामपंचायतची वना नदीच्या काठावर असलेल्या विहिरीच्या लगत वीस फूट अंतरावर दोन विहिरी नदी पात्रात खोदल्या व वडनेरच्या ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करण्याकरिता. त्यामुळे दोंडुर्डा- गावाला पाणीटंचाई भेडसावत आहे. व दोंडुर्डा गावाची असलेली वना नदीच्या काठावर वीहिर याची पातळी घसरली आहे.
महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 चे कलम तीन भूजल स्तोत्राचा पाचशे मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. त्यामुळे पाचशे मीटर परिसरात विहीर अनुदेय करू नये अशी तक्रार दोंडुर्डा ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आली आहे. वडनेर पाणीपुरवठा योजना तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धाच्या विहिरीचे बांधकाम वना नदीचे पात्रात सुरू असताना दोंडुर्डा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व गावातील नागरिकांनी महाराष्ट्र जिल्हा प्राधिकरण विभाग वर्धा यांना बांधकाम थांबविण्याची मागणी केली. व 26 जून रोजी संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन विहिरीचे बांधकाम बंद करण्याची मागणी केली होती.
त्यामुळे कविताताई विनोदराव वानखेडे सरपंच ग्रामपंचायत वडनेर ग्रामविकास अधिकारी रामटेके उपसरपंच सुभाष भाऊ शिंदे अध्यक्ष तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विनोदराव वानखेडे ग्रामपंचायत सदस्य, अरिप शेख, राहुल भुते, विनोद येळने, संजय भोयर, राजूभाऊ भोरे गजानन तागडे, कृष्णाजी महाजन, दशरथ दुर्गे, गणेश जयस्वाल यांनी दोंदुडा वासियांनी वडनेर पाणीपुरवठा योजनेचे थांबविलेले काम सुरू ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यास मागणी केली. त्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जिल्हा प्राधिकरण विभाग वर्धा, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा, व वरिष्ठ भूवैज्ञानिक भू.स.वि.य वर्धा यांची समिती नेमून अहवाल सादर केले.
त्यानुसार वरिष्ठ भू- वैज्ञानिक भू.स.वि.य वर्धा यांचे अहवालानुसार वडनेर पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे पाणी उपसा केल्यामुळे दोंडुरड्याच्या विहिरीत भूदलाच्या पातळीत घट आढळली नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे वडनेर पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे बांधकाम सुरू करू द्यावे व त्यात कुठल्याही प्रकारे अडथळा आणू नये अडथळा आणल्यास प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुढील कारवाई प्रशासनास हाती घ्यावी लागेल असा आदेश जिल्हाधिकारी वर्धा यांच्यातर्फे काढण्यात आलेला आहे.

