आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील साहूर येथे चोरट्यांनी चक्क मंदिरातून हनुमानाची मूर्तीच चोरून नेली. ही घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी आशिष नेवारे आणि अशोक नेवारे यां दोघांवर संशय व्यक्त केल्याने दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, राहूर परिसरातून वाहणाऱ्या लेंडी नाल्यालगत २००२ मध्ये गडकरी लेआउटची निर्मिती करण्यात आली. तसेच ग्राम पंचायतीच्या हद्दीत असलेल्या मोकळ्या जागेत कच्चे बांधकाम करून हनुमानजीची मूर्ती स्थापन केली. तेव्हापासूनच या मंदिराला आशिष नेवारे आणि अशोक नेवारे यांचा विरोध होता.
१६ जुलै रोजी येथीलच काही युवक रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर परिसरात बसले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी हनुमानाची मूर्तीच चोरून नेली सकाळी ही बाब गावकऱ्यांना लक्षात येताच त्यांनी सरपंच व पोलिस पाटील यांना बोलावून आष्टी पोलिसांकडे तक्रार दिली. गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार देताच पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, पोलिस उपनिरीक्षक अनिल दरेकर, नंदकिशोर वाढवे, बालाजी सांगळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तसेच गावकऱ्यांनी ज्या दोघांवर संशय व्यक्त केला त्यांना ताब्यात घेतले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

