रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील तहसील कार्यालय ते कॉलेज कडे जाणारा मुख्य रस्ता आहे त्या रस्त्या अवस्था एखाद्या खेडेगावातील शेतीत जाण्यासाठी जशी पांदन रस्त्या अवस्था असते तशीच अवस्था या परतूर शहरातील तहसील कार्यालय ते कॉलेज रस्त्याची झाली झाली आहे चार ते पाच वर्षे पूर्ण होऊन गेले पण कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मात्र अजून सुद्धा झाले नाही नगर पालिका याकडे लक्ष देत नाही किंवा माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया असतील किंवा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर असतील हे सुद्धा कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शहरात किती विकास झाला हे सिद्ध होते.
विकासाच्या नावाने बोंब मारणाऱ्या परतूर तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांचा विकासाचा बुरखा फाटला आहे. त्यामुळे आज परतूर मधील लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करून रस्त्यावरून वहिवाट काढावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यावर एखादी जीव गेल्यावर प्रशासन जागणार आहे काय? असे प्रश्न निर्माण झाला आहे.
तहसील कार्यालय ते कॉलेज कडे जाणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याने परतूर शहरातील मोठी अवजड वाहने बस, ट्रक, ट्रॅक्टर, मोठमोठे हायवा याच कॉलेज रस्त्याने जातात आणि कॉलेज ला जाणारे विध्यार्थी सुद्धा याच रस्त्याने कॉलेज ला जातात जर या रस्त्यावर खड्यात साचलेल्या पाण्याने व चिखलाने एखाद्या विध्यार्थ्याच्या जीवाला काही झाले तर कोण जबाबदार राहील असा सवाल नागरिकांनमध्ये उपस्थित आहे.
काही दिवसांपूर्वी या कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परतूर चे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाला केळाची टोपली दाखवण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकारी हे काहीच प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत याचा अर्थ असा कि जनतेहून आणि विध्यार्थ्याहून यांना काहीही देणंघेणं नाही आता वंचित बहुजन आघाडीची अशी मागणी आहे कि स्वतः जालना जिल्हाधिकारी यांनी या रस्त्याची ची दाखल घ्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे परतूर तालुका अध्यक्ष यांनी दिला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

