उमेश इंगळे, अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या मालकीची मौजे कासारखेड ता.बाळापूर जि. अकोला येथे 0 हे 81 आर शेती असुन या शेतीवर यांचे कुटूंबाचा पालनपोषण व उदरनिर्वाह अवलंबून आहे. शेतीव्यक्तीरिक्त यांच्या कडे इतर कोणतेही साधन उपलब्ध नाही. करिता महानंदा विजयकुमार शहा यांच्या शेतीमध्ये मागील दोन वर्षापासून रोडचे नवीन बांधकाम झाले असुन महानंदा विजयकुमार शहा यांच्या शेतीमधून नैसर्गिक पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानंदा विजयकुमार शहा यांच्या शेतामधून ब्रिटीशकालीन नैसर्गिक पाण्याची विल्हेवाट लावण्याची जी नाली होती या दोन वर्षात रोडच्या बांधकामाच्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामूळे ही नाली पुर्णपणे बंद झाली असुन मागिल बाजुचा जो काही भाग आहे. पाणी जाण्यासाठी तो पुर्णपणे पॅक केला असुन नैसर्गिक पाण्याचे पुर्णपणे महानंदा विजयकुमार शहा यांच्या शेतीमध्ये तलाव निर्माण झाला आहे. दोन वर्षापुवी यांनी वारंवार तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, बाळापूर व तलाठी यांना माहिती दिली असून सुध्दा कुठल्याच प्रकारची महानंदा विजयकुमार शहा यांच्या निवेदनावरती अंमलबजावणी करण्यात आली नाही.
आजवर महानंदा विजयकुमार शहा यांच्या जो अन्याय होत आहे. याची कुठेतरी आपण दखल घेतली पाहिजे जेणेकरुन शेतकरी म्हटल्यानंतर महानंदा विजयकुमार शहा यांचे दरवर्षी आमचे कुटूंबाचे पालनपोषण करण्यासाठी महानंदा विजयकुमार शहा यांच्या एकच शेती असुन त्यामध्ये जे काही उत्पन्न होते त्यामध्ये महानंदा विजयकुमार शहा यांचे कुटूंब चालते परंतु या दोन वर्षात शासनाच्या व कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाचे कामामूळे महानंदा विजयकुमार शहा यांना कुठल्याच प्रकारचे पीक उत्पादन झाले नाही व याची नुकसान भरपाई सुध्दा मिळाली नाही. महानंदा विजयकुमार शहा यांच्यावर आता उपासमारीची व आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे याव्यक्तिरिक्त महानंदा विजयकुमार शहा यांच्याकडे कोणताच पर्याय नाही.
आपणास महानंदा विजयकुमार शहा यांच्या व संपुर्ण कुटूंब आपणास हात जोडून विनंती करते की, लवकरात लवकर आपण आपली यंत्रणा लावून महानंदा विजयकुमार शहा यांच्या शेतीमध्ये जे तलावासारखे साचलेले पाणी आहे. याची विल्हेवाट लावणे व दोन वर्षात झालेले नुकसानीचा तलाठयामार्फत शेत सर्व्हे करुन शासकीय लाभ मिळवून देण्यात यावा. या संपुर्ण कुटुबांचे पुर्णपणे दिलेल्या माहितीनुसार जो काही विषय झाला असुन याची तात्काळ नोंद घेवून यांना न्याय मिळवून देण्यात यावा अन्यथा अशोका फाउंडेशन चे अध्यक्ष व संपुर्ण कार्येकते आंदोनल करतील. अशी मागणी अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

