संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हात गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या गुन्हेगारीवर अंकुश घालण्यात नागपुर पोलीस कुठेतरी कमी पडत आहे. अशाच 4 जणांच्या हत्यानी नागपूर हादरलं आहे.
नागपुर मध्ये चार जणांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे दोन व्यापाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे मृत्युदेह जाळून नदीत फेकण्यात आले होते. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर दोन घटना शहरातील जरीपटका आणि नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या आहेत.
कोंढाळी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन व्यापाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोघांचा मृत्यू देह जाळून नदीत फेकण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आली. अंबरीश गोळे आणी निराला कुमार सिंग अशी मयत व्यापाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी 5 मारेकरींना अटक केलेली आहे.
हत्याकरण्यात आलेले आलेलं अंबरीश गोळे कंट्रकदार असून दुसरे मृतक निराल कुमार सिंग याचा कपड्या विक्रीचा व्यवसाय आहे. याप्रकरणी पोलिसांनी ओंकार तलमले, लकी तुरकेल, हर्ष वर्मा, दानिश शिवपेठे, बागडे असे अटक केलेले आरोपीचे नाव आहे. त्यांच्यासोबत ओळख ही होती अमरीश व निरला सिंग यांना ओंकार ने दीड कोटीचा डीडी दिल्यास दोन कोटी 80 लाख देण्याचे आमिष दाखवले होते. याबाबत व्यवहार करण्या करता सर्वजण २५ जुलैला सायंकाळी कोंढाळी येथील तुरंकेलच्या फार्महाऊस वर भेटले होते. मात्र अमरीश आणि निरला यांनी डीडी दिल्यानंतर ओंकार ने पैसे देण्यास टाळाटाळ केली. यावरून फार्महाऊसवर वाद सुरू झाला. यातून ओंकार ने पिस्तूल काढून अंदाधुंद फायरिंग केली व त्यातून या दोघांची हत्या करण्यात आली. त्यानंतर ओंकारने आपल्या सहकारी सोबत मिळून अमरीश व निरला सिंग यांचे मृत्यूदेह जाळले व तळेगाव जवळील वर्धा नदीत नेऊन फेकले. दरम्यान दोन्ही व्यापाऱ्याच्या कुटुंबांनी ते घरी न आल्याचे शहरातील सोनेगाव पोलीस स्टेशन आणि बडी पोलीस स्टेशन तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास करताना दोघांसोबत आरोपी लकी आहे आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी सगळी सूत्रे हलवली त्यानंतर कसून तपास करण्यात आला त्यात हा हत्याकांड उघडीच आला. त्यानंतर सर्व आरोपींना अटक करून कोंढाळी पोलीस च्या स्वाधीन केले आहे.
जरीपटका आणि नंदनवन हद्दीत हत्या…. जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलाने शिवीगाळ करणारा शेखर नामक व्यक्तीचा तलवारीचे वार करून हत्या केली आहे. या प्रकरणात मुलाच्या आईने पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या घटनेत नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत अंथरुणात खेळलेला मतिमंद भावाशी बहिणीचा वाद झाल्याने भावाने बहिणीची हत्या केली. ही हत्या बहिणी सोबत झालेल्या वादामुळे भावाने तिला मारहाण केली. त्याच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी भावाला ताब्यात घेतले.

