त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोलंखे यांनी बबलू तिवडे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे बोलले.
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोल्हापूर:- साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हातील दानोळी येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू भाऊ तिवड़े यांच्या माध्यमातून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जयसिंगपुर येथील अनाथ आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोलूंखे यांच्या हस्ते पर्यावरणाच्या संतुलन राखण्यासाठी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित नगरसेवक पराग पाटील, स्वयंम सिद्धी न्यूज़चे संपादक अभय वाळकूंजे, हरिचंद्र सुर्वे, लखन तिवड़े, पवन वायदंडे अमित मानगावे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत घाटगे, अर्जुन वाघमारे, यांच्या सह शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बबलू तिवड़े यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य कौतुकास्पद असल्याचे मत उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोलूंखे यांनी मांडले. तसेच शाळेच्या वतीने सत्कार व आभार मानन्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348