मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- युवा अवस्थेत प्रत्येकाला अशक्य गोष्टी करण्याचे धाडस करावेसे वाटते आणि त्यातूनच नकळत चुका होतात म्हणून अति आत्मविश्वास हा घातकच असतो त्यामुळे सर्वांनी सांभाळूनच राहावे असे प्रतिपादन प्रमूख वक्ते म्हणून रोशन पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांनी व्यक्त केले. मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे तालुका विधी सेवा प्राधिकरण व राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते, प्रसंगी अध्यक्ष म्हणून बी. जी. पवार सह दिवाणी न्यायाधीश हिंगणघाट तर अतिथी म्हणून एन पी देशपांडे सह दिवाणी न्यायाधीश हिंगणघाट यांची उपस्थिती होती तरी मार्गदर्शक वक्ते म्हणून रोशन पंडीत उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट, अरुणा मुसळे पोलिस उपनिरीक्षक हिंगणघाट, विनोद धांडे,डॉ उमेश तुळसकर प्राचार्य मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी अरुणा मुसळे यांनी विद्यार्थीनींनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे कसे गरजेचे आहे ते सांगितले तर डॉ. उमेश तुळसकर यांनी महाविद्यालयाची सामजिक बांधिलकी बद्दल भाष्य केले, अध्यक्षीय मनोगतातून बी जी पवार यांनी सद्यस्थितीत वाहतूक नियम व कायदे यांची सांगड घालून जबाबदारीचे पालन कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, प्रसंगी सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. अभय दांडेकर तर प्रास्ताविक प्रा. प्रतिभा दुबे व आभार डॉ सपना जयस्वाल यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला वाणिज्य व विज्ञान विभागाच्या सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद सर्वांचे सहकार्य लाभले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348