संदिप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन नागपूर:- शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिक नागरिकाच्या जीवाशी खेळ करत आहे. व शासन आणि प्रशासन आखून दिलेल्या निदेशाचे पालन न करता ते पायाखाली तुडविले जात आहे. त्यामुळे नागपुर एफडीएची धडक कारवाई सुरू केली आहे.
नागपुर शहरात मिठाई विक्रेत्यांनी मिठाईच्या ट्रेवर उत्पादन आणि मुदतबाह तिथी लिहणे कायदानें बांधणकारक आहे. पण कायद्याचे पालन केलेल्या 42 दुकानदारांकडून एप्रिल 2022 पासून आजपर्यंत केलेल्या दंडात्मक कारवाई 2.79 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच नमकीन खोवा, बर्फी, कलाकंद बर्फी, मोदक, रसगुल्ला, पेढा, काजू-कतली, लाडू, बुंदी, गुलाब जामुन, श्रीखंड, ऑइल, वनस्पती व कोकोनट पावडर या अन्न पदार्थांचे एप्रिल 2022 पासून आज पर्यंत एकूण 129 नमुने विश्लेषनासाठी घेण्यात आले. त्यातील 101 नमुने प्रमाणित तर 12 नमुने अपमानित असल्याचे आढळून आले. अशा हॉटेल व्यावसायिक यांच्य विरोधात न्याय निर्णय प्रकरण दाखल करण्यात आली. व दंड वसूल करण्यात आला तर 3 प्रकरणांमध्ये खटले दाखल करण्यात आले आहेत.
सणासुदीच्या दिवसात खोवा, मिठाई व दूध अन्न पदार्थापासून तयार होणारे अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणले जातात. जनतेला हायजेनिक अन्न पदार्थ मिळावे म्हणून नागपूर विभागीय अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील मिठाई विक्रेते, उत्पादक, हॉटेल्स, रेस्टॉरंट आदि व्यवसायिकांच्या नियमित तपासण्यात करण्यात येते आहेत. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवते बाबत तक्रार असल्यास विभागाचा दूरध्वनी ०७१२/२५६२२०४ आणि एफ एसएसआयएआय च्या ऑनलाईन हॉटेलवर तक्रार करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त (अन्न ) अभय देशपांडे यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348