रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतुर:- तालुक्यातील संकनपुरी येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीचे अवचित साधून संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने दारूबंदी करून एक नवा इतिहास निर्माण केला व गावातील नसीले पदार्थाची साफसफाई झाली.
यावेळी महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना गावचे प्रथम नागरिक शिवाजी कोरडे सरपंच ग्रामपंचायत सदस्य मदनरावजी टेकाळे, अशोक भांडवले व प्राचार्य जगन्नाथ रासवे यांनी प्रतिमेचे पूजन केले. संकनपूरी येथील तीन अवैध दारूच्या दुकानावरती जाऊन संपूर्ण मुद्देमाल याची होळी करून एक चांगल्या प्रकारचे साफसफाई गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. जेणेकरून गावातील आरोग्य व भांडण तंटा कमी होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल. त्यानिमित्ताने गावांमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील व संपूर्ण गावकऱ्यांचे आरोग्य चांगले राहील.
यावेळी गावकऱ्यांना संबोधित करताना प्राचार्य जगन्नाथ रासवे यांनी गांधीजींच्या जीवनावरील इतिहास व स्वातंत्र्य विषयी चळवळी विशद केल्या. महात्मा गांधीजींचे स्वतंत्र्याविषयीचे योगदान त्यांचे असहकार चळवळ व सत्याग्रह याविषयीचे मोलाचे मार्गदर्शन केले. पालकांनी आपल्या मुलांचे आरोग्य जपले पाहिजे आपले मुलं हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे असेही त्यांनी विशद केले. संकनपुरीचे प्रथम नागरिक शिवाजी कोरडे यांनीही दारूबंदी विषयी माहिती दिली. दारूबंदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांचे व आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांचे योगदान राहिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामेश्वर सुपेकर, संतोष सुभेदार, राधाकिसन सुपेकर, महारुद्र टेकाळे, गणेश गिराम, ज्ञानेश्वर टेकाळे, सुहास चौधरी, लक्ष्मण डांगे, शुभम कणसे, बाबासाहेब हंबाडे, तुकाराम कांबळे, हनुमान नवघरे, महादेव चांदगुडे, महादेव कोरडे व समस्त गावकरी मंडळी संकनपुरी यांनी सहकार्य केले. यावेळी दारूबंदीच्या बंदी विषयी संपूर्ण पंचक्रोशीतील आनंद व्यक्त होत आहे. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

