देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय हिंगणा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य चळवळ सुरू करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधीजींचे फार मोठे योगदान लाभले असून त्यांची अहिंसा, क्षमा, शांती व सहिष्णूता ही संकल्पना संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरली असल्याचे विचार विठ्ठलराव कोहाड यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सिराज (बबलु) शेटे, सचिन राऊत, स्वराज्य संस्था अध्यक्ष शशिकांत थोटे, फिरोज शेख, सिद्धार्थ बागडे, स्वप्निल गांगुर्डे, भास्करराव धार्मिक,दत्तात्रय अड्याळकर, भाऊराव लंबोदरी, शफीभाई शेटे, हेमचंद्र ठकराल, मस्जिद शेटे, सुहास कोहाड, नंदु इटनकर, शाहिद झाडिया, मोतीराम कडूयुनुस खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद महाजन, निकेश धार्मिक, मुकेश कटारे, भूतेश्वर धार्मिक, सेवकराम लिखार, रामकृष्ण पौनिकर, ताराचंद शिवरकर, तुळशीराम लिखार ज्ञानेश्वर चुनारकर, प्रकाश तिवस्कर, लव पाटणकर, राजेश धार्मिक, राजू मोहोड व सेवक भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शशिकांत थोटे, उपसरपंच सिराज (बबलु) शेटे, सचिन राऊत, जावेद महाजन व दत्तात्रय अड्याळकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी ग्राम स्वच्छता अभियान दिनांक २१ ऑक्टोंबर २०२३ ला वाचनालयाच्या वतीने राबविण्यात येणार असून ग्रामस्थांनी आपला सहभाग दर्शविला असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भास्करराव धार्मिक यांनी तर उपस्थितांचे आभार सेवकराम लिखार यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

