वंचित बहुजन आघडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी व पंचायत समिती परतूर यांना निवेदन.
रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हात रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अफरातफर सुरू आहे. त्यामुळे सरकारच्या या महत्वपूर्ण रोजगाराच्या योजनेला काळीमा फासने सुरू असून शेकडो गरजवंत बेरोजगार आज रोजगारापासून वंचित आहे.
पंचायत समिती परतूर अंतर्गत रोजगार हमी योजने अंतर्गत पांदन रस्ते, शेततळे, सिंचन विहिरी ई अनेक विकास कामे चालू आहेत सदरील कामे हे मजुरा अंतर्गत मस्टर द्वारे करण्याचे शासनाने ठरवून दिलेले आहे परंतु परतूर तालुक्यात कुठल्याही प्रकारे मजूर कामावर नसून सदरील कामे जेसीबी किंव्हा पोकलन द्वारे केले जात आहे.
तालुक्यात पांदन रस्ते हे गावोगावी केल्या जात आहेत सदरील रस्त्याच्या मजूर हजेरी पत्रक दररोज प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने हजेरी पत्रक भरावयाचे परंतु गावचे रोजगार सेवक घर बसल्या हजेरी पत्रक भरत आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारे शासनाने ठरवून दिलेल्या निकषावर काम होत नसल्याने आपण सबंधित कमासाबंधी शहानिषा करून जे दोषी कर्मचारी असतील त्यांची चौकशी करून निलंबित करावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
प्रमुख मागण्या…
१) मातोश्री पांदन रस्त्याच्या कामावर रोज मजूर हजर आहेत का नाहीत त्यांची चौकशी करण्यात यावी व बोगस घरबसल्या हजेरी घेणारे रोजगार सेवक यांची चौकशी करण्यात यावी.
२) मनरेगा अंतर्गत संबंधित संपूर्ण इंजिनियरची चौकशी करण्यात यावी व अमोल राठोड यांची १ जानेवारी ते १५ जून २०२३ पर्यंत मो. क्र. 9284173499 या नंबर वर फोन पे चा रेकॉर्ड तपासणी करून केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करावी.
३) परतूर तालुक्यातील रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरी व शेततळे इ, बोगस कामाची चौकशी करण्यात यावी.
४) पंचायत समिती अंतर्गत रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे बोगस बिल काढणाऱ्या इंजिनियरची चौकशी करण्यात यावी इ,
या सर्व मागण्या संबंधित चौकशी न झाल्यास व तसा अहवाल आम्हाला न कळवल्यास दि १५ डिसेंबर रोजी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने देण्यात आला.