आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्यात मराठा आणि ओबीसी समाजाचे आंदोलन, सभा, मोर्चे सुरू आहे. त्यात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात ओबीसी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण राज्यात ओबीसींची एल्गार सभा घेऊन ओबीसीच्या विविध प्रश्नांसाठी वाचा फोडण्याचे काम करत आहे.
त्यामुळे विदर्भातील पहिली ओबीसी एल्गार सभा वर्ध्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. पण ही सभा फ्लॉप शो ठरली आहे. या सभेत माणसं कमी आणि खुर्च्या जास्त अस चित्र सर्वत्र दिसून येत होत. त्यात छगन भुजबळ हे या सभेला आले नसल्याने अनेक ओबीसी बांधवांचा भ्रम निराश झाला.
या महाएल्गार सभेला छगन भुजबळ हे मुख्य मार्गदर्शन म्हणून येणार होते पण सकाळ पासूनच त्यांची तबीयत बरी नसल्याने ते मुंबईला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सभेत प्रकाशअण्णा शेडगे, महादेव जानकर, खा. रामदास तडस, आ. गोपीचंद पडळकर, डॉ. बबनराव तायवाडे, शब्बीर अन्सारी, प्रा. लक्ष्मण हाके यांची उपस्थिती होती.