संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मोबा न. 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- अवघ्या भारतभर आदिवासी समाजात झालेल्या धर्मांतरण विरोधात मनुवादाच्या कुटील डावातून जन्माला आलेल्या जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने आदिवासी समाजाला संपविण्यासाठी एक मोहीम चालविल्या जात असून, याचे पडसाद महाराष्ट्रात ही बघावयास मिळत आहे. याच्या विरोधात अनेक आदिवासी संघटनांनी नागपूर हिवाळी अधिवेशनावर हजारोच्या संख्येने जन आक्रोश महामोर्चा काढला.
विद्यमान केंद्र सरकार व मनुवादाशी संलगणित विविध राज्य सरकार हे सुद्धा जनजाती सुरक्षा मंचाच्या ह्या मुद्द्याला घेऊन अधिवेशनात धर्मान्तरीत आदिवासीच्या विरोधात विधेयक आणण्यासाठी हेतूपुरस्सर मांडणी करीत आहे. त्यात महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू असल्यामुळे महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांचा असंतोष तीव्र झाला व समस्त आदिवासी संघटनांच्या वतीने डी- लिस्टिंग विरोधात दिनांक 15 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर हजारोच्या संख्येने आदिवासींचा जन आक्रोश महामोर्चा काढला. ज्यात गोंडवांना गणतंत्र पार्टी, ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन, आदिवासी परधान समाज संघ, बिरसा क्राती दल, मूलनिवासी मुक्ती मंच हलबा हलबी संघटना, कोलाम संघटना, पारधी संघटना अशा विविध संघटनांनी सहभाग नोंदवीला.
मोर्चाचे स्वरूप यशवंत स्टेडीयम ते झिरो माईल्स असे होते. मोर्चा यशवंत स्टेडीयम वरून सीताबर्डी मार्गे झिरो माईल्स इथे पोहचला. या विराट मोर्चामुळे नागपूरची प्रमुख मार्गाची वाहतूक खोळंबली होती ते बघून सरकारने तात्काळ मोर्चेकऱ्यांना निवेदन घेऊन विधानभवनात येण्याचे आमंत्रण दिले व डी लिस्टिंग सह विविध मागण्यावर चर्चा झाली.
दरम्यान डी लिस्टिंगच्या मोर्चाला एकमेव आमदार ज्यांनी उपस्थिती दर्शविली असे आमशादादा पाडवी हे उपस्थित झाले होते. याविरुद्ध विधान भवनात ह्या मुद्द्यावर ते आदिवासींची गभीरपणे भूमिका मांडत असून त्यांनी उपस्थित मोर्च्याला संबोधित ही केले. या मोर्च्यात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हरीश उईके, अखिल भारतीय आदिवासी परधान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश बाबूराव मडावी, बिरसा क्राती दलचे अध्यक्ष दशरथ मडावी तथा समाजकल्यान आयुक्त आर.डी.आत्राम सह इतर मान्यवरांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले.
एकंदरीत ह्या मोर्चातून आदिवासी एकतेचा परिचय व अन्याया विरुद्ध महाराष्ट्रातील सर्व आदिवासी एकत्र येऊन जुलमी सत्तेविरुद्ध मैदानात येणार व सत्ताधाऱ्यांना वटणीवर आणणार त्यासाठी ह्या मोर्चाचे महत्व अधिक महत्वाचे दिसून आले. तसेच ह्या मोर्चाचे वैशिष्ट म्हणजे ह्या मोर्चात सर्व स्वयंस्फूर्तीने हजर झाले होते. आता ही नांदी गावोगावी पोहचणार व आपल्या हक्क आणी अधिकारासाठी कुठल्याही राजकीय मनुवादाच्या दावणीला न जाता स्वतः चे अस्तित्व स्वतःच निर्माण करणार असा हा मोर्चा इतिहास घडविणारा प्रवास ठरेलं हे मात्र निश्चित.
तरी ह्या मोर्चात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या ज्या संघटनांनी जागरूक आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवीला व सरकारला जो महत्वाचा ईशारा देणे गरजेचे होते त्यासाठी पुढाकार घेतला त्या सर्वांचे मी हे इतिवृत्त मांडताना जाहीर आभार व्यक्त करतो व ही सूचना ही करतो की, ही लढाई थांबलेली किंवा संपलेली नाही. त्यामुळे असाच एकतेचा व जागरूकतेचा परिचय जिवंत ठेवा व आपल्या आदिवासी अस्मितेसाठी तयार रहा. गावागावांत आदिवासी बांधावांना जागरूक करा. कारण येणारे दिवस हे आदिवासी समाजाला अत्यंत घातक असणार आहे. त्यात कुठल्याही एका जमातीचे नुकसान नसून सर्व आदिवासीचे पतन आहे.

