या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ता नंदेश्वर मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थिती.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा जवळ रसपल्ली येथे दिनांक 01 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून यावेळी विजय स्तंभाला यावेळी अभिवादन करण्यात आले.
भीमा कोरेगावचां इतिहास लोकांना महिती झाला पाहिजे म्हणून गेल्या चार वर्षापासूनच आंबेडकर नगर रसपल्ली येथे या कार्यक्रम आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ता नंदेश्वर मेश्राम तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद केंद्र प्रमुख सखाराम झाडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिमलगट्टा येथील प्रमुख पाहुणे म्हणून व्येंकटी राजा बोरकुट, अशोक दुर्गे, नरेंद्र जनगम या सर्व मान्यवरांनी 01 जानेवारी 1818 मध्ये भीमा नदीचे काटावर 500 महारांनी 28000 हजार जातीवादी मानसिकतेच्या पेशव्याचा सैन्याचा पराभव करत क्रूर पेशवाईचा अस्त केला. ही लढाई नसून मानव मुक्तीचा लढा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी त्या 500 शूरवीर सैनिकांना अभिवादन करून मानवंदना दिली पाहिजे. असे मौलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी सोनाली मधुकर कोंडागुर्ले, शीतल रवींद्र रामटेके यांनी भीमा कोरेगावचां इतिहासा बदल खूप छान गीत गाईले आणि उपस्थित नागरीका मध्ये नवी ऊर्जा निर्माण केली. या कार्यक्रमाचे संचालन दिवाकर दहगावकर जिल्हा परिषद शाळा आंबेडकरनगर रसपल्ली यांनी केले. या कार्यक्रमात हजारोंचा संख्याने बौध्द उपासक आणि उपासिका उपस्थित होते. हा कार्यक्रम शांततेने पार पाडला.

