मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री पंचमुखी हनुमान मंदिर शहालंगडी अध्यक्ष श्री महंत वासुदेव महाराज यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले त्यामुळे दरवर्षी होणारा संतोषी माता यात्रा उत्सव सप्ताह कार्यक्रम रद्द करण्यात आला होता परंतू दिनांक १ जानेवारी ला काल्याचेकिर्तन, काला कार्यक्रम पार पडला असुन यात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रेमुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने शहालंगडी परीसरात पतांजलिच्या पुढाकाराने जिल्हा अध्यक्ष वसंतराव पाल यांचे मार्गदर्शक स्वच्छता अभियान राबवून मंदिर परिसरातील कचरा, पात्रळ्या द्रोण, प्लास्टिक जमाकरून विल्हेवाट लावण्यात आला.
शहालंगडी मंदिरपरिसर स्वच्छेतेसाठी पतांजलि परिवाराचे सदस्यांनी श्रमदान करून स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पाडले यावेळी प्रा. ज्ञानेश्वर खडसे, डॉ. गंगाधर नाखले, सुरेश दविले, राजा महाराज शेंडे, अजय मोहोड, प्रा.अनिल तरोडकर, योग शिक्षक योगेश सुंकटवार, अनिल राजपांडे, वैभव निनावे, आयुष हावगे, पुरणलाल जैस्वाल, रवि भालेराव, प्रमोद भाईमारे, परमेश्वर खडसे, गोपाल मांडवकर, रामानंद चौधरी, कलुरकर साहेब, रामटेके प्रवीण वरटकर, लक्ष्मण तेजने, सुभाष ठाकरे, बाकडे सहभागी झाले होते.