उप पोलिस स्टेशन राजाराम खा. अधिकारी अमलदार यांनी स्वखर्चातून 18 हजार किमतीचा फिल्टर आरो लावून पिण्याचे पाणीची समस्या दूर
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- दि. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. सदर दिनाचे औचित्य साधून उप पोलीस स्टेशन राजाराम खादला येथे दि. 02 जानेवारी ते 08 जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.
आज दि. 05 जानेवारी रोजी उप पोलीस स्टेशन राजाराम खा. येथे 11:00 ते 12:00 वाजता भगवंतराव आश्रम शाळा राजाराम येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे शाळेतील शिक्षक वर्गानी उपपोलिस स्टेशन येथे समस्याबाबत कळविले या समस्या बाबत अधिकारी व अमलदार समस्याची गंभीरता पाहून विचार करून आपल्या सहखिशातून निधी गोळा करून आश्रम शाळेतील आदिवासी मुला- मुलींचे आरोग्याचे विचार करून नवीन फिल्टर मशीन बसवून देण्याचे ठरविले व आज रोजी आरो मशीनचे उदघाटन करून मुलांना असलेल्या समस्याचे निराकरण करून देण्यात आले.
सदर कार्यक्रमालाचे अध्यक्ष पोउपनि वाकळे सीआरपीएफ गट क्र.1 पुणे हे होते. प्रमुख पाहुणे उप पोलिस स्टेशन राजाराम खा चे प्रभारी अधिकारी पोउपनी साहेबराव कसबेवाड, पोउपनी सचिन चौधरी, पोउपनी जाधव तसेच शाळेचे मुख्याध्यापक बासनवर, श्री. मेश्राम, श्री. ओडनालवार तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व जिल्हा पोलिस सीआरपीएफ चे सर्व अमलदार उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी भगवंतराव आश्रम शाळेतील 420 शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

