प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- महाडीबीटी पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी व परीक्षा या योजनेचे अर्ज भरण्याकरीता पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी दि.31 मार्च अंतीम मुदत असून विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज तत्काळ भरुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत अद्यापपर्यंत 37 टक्के अर्ज भरण्यात आल्याची नोंद झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ भरुन घ्यावे तसेच महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरुन घ्यावे. महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेल्या अर्जाची तपासणी करुन विहित मुदतीत सादर करावे. अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील. याची नोंद महाविद्यालयांनी घ्यावी, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी कळविले आहे.