आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शहराला लागून असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानाकावर आज एक मोठी दुर्घटना होता होता थोडक्यात टळली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 वर रिले रूमच्या बाजूला असलेल्या बहुउद्देशीय सेवा केंद्रात पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमूळे आग लागली. आग दिसून येताच सिग्नल ड्युटी वर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सतर्क होत समय सूचकता दाखवत त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सूरू झाले.
सिग्नल कर्मचाऱ्यांनी आगीचे लोळ दिसताच प्रथम त्यांनी अग्निशमन यंत्रणेस सूचित केले. एल अँड टी कंपनीची अग्निशमन यंत्रणा त्वरित घटनास्थळी दाखल झाली. या चमूतील अहफाज पठाण, राजेश ढोबे व सहकऱ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सूरू केले. तेव्हाच वर्धा पालिकेची अग्निशमन यंत्रणा पोहचली. प्रथम स्टॉलला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर बाजूच्या रिले रूमला आगीपासून दूर ठेवण्यात यंत्रणेस यश आले. पण सुरवातीस लागलेल्या आगीत एक दुकान जळून खाक झालेच. यामुळे सदर दुकानदाराचे मोठे नुकसान झाल्याची चर्चा आहे. आग विझविण्यात त्वरित यश आल्याने मोठी दुर्घटना टाळता आली.
रेल्वे क्रॉसिंगवर होणाऱ्या दुर्घटना हा मुख्य विषय होता. त्याबाबत जागरूकता वाढविणे तसेच या दुर्घटना होवू नये म्हणून अपेक्षित उपाय अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. सुरक्षा बाबत पॉम्पलेट, स्टिकर वाटण्यात आले. पण आगीची घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासन चिंतेत पडल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे.