रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील मंठा तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बोरगाव येथील दोन तरुण वाटुरवरून मंठ्या कडे दूचाकी मोटर सायकल ने जात असताना केंधळी येथील साई प्रयाग हॉटेल जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्यांना जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
ट्रक व दुचाकी मोटर सायकल अपघातात ज्ञानदेव डोके व रविंद्र तुरेराव रा. बोरगाव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेमुळे संपूर्ण मंठा तालुक्या सह बोरगाव नगरी वर शोककळा पसरली आहे.
या अपघाताची माहिती मंठा पोलीस स्टेशन ला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यावेळी ट्रक चालकावर मंठा पोलीस स्टेशन येथे कलम 106 (1), 324, (2) भारतीय न्याय संहिता कलम 134/177 मोवाका सह गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारती साहेब हे करत आहेत.