मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- भारत तसा अनेक समस्याने ग्रस्त आहे. त्याची वेगवेगळी कारने असली तरी वाढती लोकसंख्या हे मुख्य कारण आहे. सरकार ची मानसीकता, जनतेची अनास्था, साक्षरतेचे कमी प्रमाण, जनजागृतीची कमतरता व ईतर कारने आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष पुर्ण होत असताना सर्व समस्याची जळ असलेल्या वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न आपण सोडवु शकलो नाही. “जागतिक लोकसंख्या दिन” म्हणून चर्चा करण्या पलिकडे फार काही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. देशा करीता आपल्या स्वतः च्या कुटुंबा करीता पण वाढती लोकसंख्या अडचणीची आहे हे आपल्याला पण कळत नाही. हे फार मोठी समस्या आहे. देशा पेक्षा समाज, धर्माला मोठ करण्यासाठी लोकसंख्या वाढविण्याची जर कोणाची द्रुष्ट मानसिकता असेल तर ते तर फारच मोठी समस्या आहे. भारत सरकारने त्वरीत “समाण नागरी कायदा” करुन यावर त्वरीत उपाययोजना करण्याची गरज आहे
1947-2024 भारताची लोकसंख्या: भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर व पाकिस्तान वेगळा झाल्या नंतर 1947-48 ला भारताची लोकसंख्या 34 करोड होता.1951 ला स्वतंत्र भारताची जनगणना झाल्यावर भारताची लोकसंख्या 36,10,88,090 झाली म्हणजे 3 वर्षात 2 करोड वाढली. 1961 ला भारताची लोकसंख्या 43,89,36,918 झाली. म्हणजे 10 वर्षात लोकसंख्या 7 करोड 79 लाखानी वाढली.1971 ला भारताची लोकसंख्या 54,79,49,809 ऐवढी झाली. म्हणजे 10 वर्षात लोकसंख्या जवडपास 11 करोडनी वाढली. 1991 ला भारताची लोकसंख्या 84,64,27,039 झाली. म्हणजे 20 वर्षात लोकसंख्या जवडपास 30 करोडनी वाढली. 2001 ला भारताची लोकसंख्या 1,028, 737, 436 ऐवढी झाली. म्हणजे 10 वर्षात जवडपास 16 करोड लोकसंख्या वाढली. 2011 ला भारताची लोकसंख्या 1,21,08,54,977 झाली. म्हणजे 10 वर्षांत लोकसंख्या जवडपास 20 करोड ने वाढली. 9 जुलै 2024 ला भारताची लोकसंख्या UNO च्या आकडेवारी प्रमाणे 1,442,039,740 ऐवढी झाली आहे. म्हणजे 13 वर्षात लोकसंख्या जवडपास 23 करोड ने वाढला आहे. UNO चा अनुमान आहे की जर ठोस उपाययोजना केल्या गेली नाही तर पुढील 77 वर्षानी भारताची लोकसंख्या दुप्पट होईल.
जगातील लोकसंख्येच्या 17.76% जनसंख्या भारतात राहतो व जगाच्या क्षेत्रफळाच्या 2.4% च क्षेत्रफळ भारतात आहे. भारतात 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्या 24.2%, 10 ते 19 वयोगटातील 17%, 10 ते 24 वयोगटातील 26%, 15 ते 65 वयोगटातील 68.7% तर 65 वयोगटातील वरचे 7.1% अशी लोकसंख्या आहे.
भारत देश आपला आहे. देशाच्या उज्वल भविष्या करीता, आपल्या भावी पिढीच्या उज्वल भविष्या करीता, देशभक्त नागरिक म्हणून आपण लोकसंख्या नियंत्रणात राहील या करीता आजच्या “जागतिक लोकसंख्या दिनी” संकल्प केला पाहिजे व भारत सरकारने “समाण नागरिक कायदा” करुन वाढत्या लोकसंख्येवर नियत्रंन आणले पाहिजे.आजच्या दिवसी मला असे वाटतो असे परखड मत जागतिक लोकसंख्या दिन निमीत्ताने भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनी मांडले.