मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पतांजलि योग समिती व पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव, ग्रामस्थांच्या वतीने भव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निसर्गाची संतुलन राखण्यासाठी वृक्ष लावणे व जगणने आवश्यक आहे याची जनजागृती व्हावी व विद्यार्थ्यांना सुद्धा सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशाने वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान ट्रस्ट वर्धा जिल्हा प्रमुख वसंतराव पाल यांचे मार्गदर्शनात वृक्ष दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
वृक्षदिंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव येथून रितसर वृक्ष पुजन करून करण्यात आली यावेळी चिमुकल्यानी झाडे लावा दारोदारी, समृध्दी येई घरोघरी, झाडे लावा जीवन वाचवा, एक मुल एक झाड इ. घोषवाक्य देत दिंडी काढण्यात आली. वेगवेगळ्या वेशभूषा करून मुलींनी दिंडीमध्ये सहभाग घेतला होता वृक्षदिंडीचा समारोप झाल्यानंतर निंब, करंजी, जामुन, चिंच रोपांचे वाटप करून प्राथमिक शाळा परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या भव्य वृक्ष दिंडी कार्यक्रमाला पल्लवी गौळकार अध्यक्ष शाळा समिती, गुंडे मुख्याध्यापक, निळकंठराव नंदुरकर, माधुरी गौळकार, सारीखा नंदुरकर, रमेश खरातकार, नितीन गौळकार, राजेंद्र वरखेडे पतांजलि परिवाराचे सदस्य ज्ञानेश्वर खडसे राजामहाराज शेंडे, डॉ.गंगाधर नाखले अनिल तरोडकर, अजय मोहोड, प्रमोद भाईमारे, केशव हिवरकर प्रा.सुरेश दविले, मनोहर झोटिंग, रवि भालेराव, पुरणलाल जैस्वाल, वैभव निनावे, परमेश्वर खडसे, रामानंद चौधरी, आयुष हावगे, मनोहर झोंटींग, सुभाष ठाकरे, राजु भगत, शांताराम हिवरकर, अनिल भाईमारे, सुधाकर सायंकार, शरदचंद्र बाकळे, सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, सदस्य जिल्हा परिषद शिक्षक उपस्थित होते सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापका सह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिकांनीव सहकार्य केले.