रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील परतूर येथील ग्रामीण रूग्णालय डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे रुग्णाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण रूग्णालय परतूर येथे रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेण्यासाठी येत आहे. पण डॉक्टर फालतू कारण देऊन चक्क रुग्णांना उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे नागरिकांत मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत आहे.
रुग्ण ग्रामीण रुग्णालय उचारासाठी आले असताना रुग्ण मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे असे विचित्र कारण सांगून डॉ. सय्यद हे कॅबिन मधुन उठून गेले आणि म्हणाले की जोपर्यंत गर्दी कमी करणार नाहित तो पर्यंत मी रुग्णांना तपासणार नाही अशी धमकी रुग्णाला दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडी परतूर तालुका अध्यक्ष रा. आंबा येथील रहिवासी हे त्यांच्या भाचीचा ब्लड तपासणी रिपोर्ट आणण्यासाठी गेले असता त्यांना डॉक्टर सय्यद यांनी बाहेर जा असे धमकी दिल्या सारखी वागणूक दिली आणि रुग्णांना व्यवस्थित तपासण्या न करता फक्त गर्दी कमी करतांना दिसत आहे.
डॉक्टर दुर्गावाड वैद्यकीय अधिकारी यांचे रुग्णालयात लक्षच नाही अशाकामचोर डॉक्टरांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जाते कारण ग्रामीण रूग्णालय परतूर येथे रुग्णांना पिण्यासाठी पाणी नाही त्यामुळे परतूर येथील ग्रामीण रुग्णालय भगवान भरोसे सुरू आहे.