उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ,श्रावस्ती विहार सांगली त्यांच्या वतीने सुरू असलेला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास पावन पर्व च्या अनुषंगाने रविवार दिनांक 08/09/2024 रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये डॉक्टर भंते यश काशपायन महाथेरो यांनी करुणेचे महासागर, महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधीसत्व विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस धूप दीप पुष्प यांनी अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
सर्वप्रथम विहाराचे सह खजिनदार आयुष्यमान जगन्नाथ आठवले यांनी सर्व उपस्थित उपासक, उपासिका, माता बंधू भगिनी ,संचालक मंडळ यांचे स्वागत केले. तसेच भंते महाथेरो डॉक्टर यश कष्यपायन यांचा थोडक्यात परिचय करून दिला.त्यानंतर त्यांचे स्वागत जेष्ठ सदस्य बोरखडे मामा तथा बोधिसत्व धम्म रत्न यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भंतेजी यांनी सर्वांना दहा मिनिट आना पानसतीचा सराव करून मंगल मैत्री चे महत्व जीवनात आवश्यक असल्याचे सांगितले. दररोज अनापानसती केल्यामुळे मन स्थिर व शांत होते. त्यानंतर बुद्ध धम्म संघ त्रिरत्न वंदना ग्रहण करून देणेबाबत, भंतेजी यांना याचना केली. त्यानंतर भंतेजी यांनी बुद्ध धम्म संघ वंदना तसेच भीम स्तुती सर्व उपासकाकडून पठण करून घेतली. बौद्ध धम्मा मध्ये बुद्ध,धम्म, संघ ही तीन रत्ने अत्यंत महत्त्वाची असून समुद्रा एवढी अथांग आणि सर्व रत्ना पेक्षा श्रेष्ठ महान रत्ने आहेत, असे सांगितले. महा परित्राण पाठ जीवनामध्ये आवश्यक असुन त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शेवटी खजिनदार एस. आर. मानेसर यांनी काही निवेदन सादर केली तसेच कार्यक्रमाची सांगता व उपस्थितांचे आभार आयु. नागवंशी सर यांनी आभार मानले. धम्मपालन गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.