मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
मुलचेरा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या मार्कडा (कंसोबा) ते मुलचेरा, घोट ते मुलचेरा आणि आलापल्ली ते मुलचेरा या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी भाजप महिला मोर्चा प्रदेश चिटणीस मा. रेखाताई डोळस यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी अधीक्षक अभियंता मा. नीता टाकरे मॅडम यांना प्रत्यक्ष भेटून सूचना व निवेदनाव्दारे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुलचेरा तालुक्याला जोडणारे हे तिन्ही प्रमुख मार्ग सध्या खड्डेमय झाले असून, वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत.
खराब रस्त्यांमुळे रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचवणे कठीण झाले आहे.
शेतकरी आणि व्यापाऱ्यांचेही या दुरवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
अधीक्षक अभियंता मा. नीता ठाकरे मॅडम यांच्याशी चर्चा करताना रेखाताई डोळस यांनी स्पष्ट केले की, अनेकदा पाठपुरावा करूनही या रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. जर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ सुरू केली नाही, तर भाजप महिला मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला….
