माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या संवादाला हजारो नागरिकांची उपस्थिती
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
एटापल्ली:- तालुक्यातील अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त व मागासलेल्या गाव म्हणून ओळख असलेल्या तांबळा येथील नागरिकांसोबत आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी संवाद साधत त्यांच्या गावातील मुख्य समस्या जाणून घेतल्या. यावेळी तांबळा सह परिसरातील हजारो नागरिकांनी संवादाला उपस्थित राहून माजी आमदार दिपक आत्राम यांच्यापुढे प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य, सिंचन, रस्ते, वनहक्के दावे, शिक्षण, रोजगार असे अनेक समस्या मांडल्या असता माजी आमदार आत्राम यांनी तांबळा व परिसरातील गावांमधील समस्या सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू व समस्यांची निराकरण साठी वेळप्रसंगी सरकारकडे पाठपुरावा करू,असे आश्वासन दिले. माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या संवादाला तांबळा येथील हजारो नागरिकांची उपस्थिती होती.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

