मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- मैदानी खेळ शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक असून खेळातून सांघिक भावना निर्माण होते असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले. ते चंद्रा येथे भव्य क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, माजी सरपंच बालाजी गावडे, मखमुर शेख, लक्ष्मण मडावी, मोहन वेलादी, नागेश कुमरे, मारोती वेलादी, बिच्चू वेलादी, जमुनाथ सडमेक, मारोती वेलादी, ईश्वर आलाम, लालू सिडाम, दसरीबाई गावडे, सुरेखाताई वेलादी, सगणीबाई सोयाम मंडळाचे युवक,युवती आणि समस्त गावकरी तसेच स्पर्धेतील चमू उपस्थित होते.
पुढे बोलताना खेड्यात विविध स्पर्धेचे आयोजन केले जात आहे त्यामुळे येथील युवकांना क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे. या माध्यमातून खेड्यापाड्यातील उत्कृष्ट खेळाडू समोर येत आहेत. खेळात असेच सातत्य ठेवल्यास भविष्यात नक्कीच याचा फायदा होणार असून अभ्यासासोबतच विविध खेळ खेळने आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान चंद्रा गावात प्रवेश होताच गावकऱ्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात मोठ्या जल्लोषात भाग्यश्री ताई आत्राम यांचे स्वागत केले.मागील दहा दिवसांपासून याठिकाणी भव्य क्रिकेट स्पर्धा सुरू होती.अंतिम सामना मुलचेरा तालुक्यातील कोळीगाव आणि चंद्रा मध्ये रंगली. अखेर कोळीगाव संघाने प्रथम पारितोषिक पटकावले, द्वितीय चंद्रा तर तृतीय पारितोषिक इनभट्टी ने पटकाविला. यावेळी भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

