✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील वडनेर गावात सात ते आठ वर्ष पासून सर्विस रोड चे काम थांबून असल्यामुळे सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वडनेर गावातून राष्ट्रीय महामार्ग 44 गेला आहे. आतापर्यंत वडनेर प्रभागातील विकास जोमात सुरू होता, वडनेर हे हिंगणघाट तहसील मधील सर्वात मोठा गाव व त्यांच्या पद्धतीची इथली बाजारपेठ आहे. वडनेर गावाला लागून 40 खेडे आहे तसेच बाजारपेठ मोठी असल्यामुळे सर्व गावातील लोक वडनेर या गावी येतात पण आज वडनेर गावातील नागरिक अनेक समस्यांना समोर जात आहे.
2014 साली महामार्ग 44 वरील वडनेर गावात उडान पूल बनवण्यात आला व गावात जाण्याकरता एक बोगदा ठेवण्यात आला त्या बोगद्याची उंचाई कमी असल्यामुळे कोणतेही मोठे जड वाहन गावात येण्यास असमर्थ आहे. त्यामुळे गावातली बाजारपेठ, व्यापारी, मोठा धक्का सहन करावा लागत आहे. वडनेर गावाच्या विकास थांबला आहे. असेच काहीसे दारोडा गाव मध्ये पण घडले आहे.
दारोडा या गावात एका बाजूला सर्विस रोड नसल्यामुळे चार ते पाच लोकांच्या जीव गमावण्यात आला आहे. त्यासाठी गुरुदयालसिंग जुनी सदस्य वडनेर व गावकरी यांचे मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेत्या खा. सुप्रिया सुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या सर्वांना मुंबई येथे जाऊन गावातील समस्या बाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी गुरुदयाल सिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर महाराष्ट्र कोषाध्यक्ष, ठाकूरसिंघजी बावरी महाराष्ट्र प्रेसिडेंट सिख सिकलिकर, विक्कीसिंघ बावरी अकोला जिल्हा अध्यक्ष या सर्वांनी गावाबद्दल चर्चा करून लवकरात लवकर वडनेर उडान पूल व सर्विस रोड दारोडा सर्विस रोड करून द्या अशी मागणी केली.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

