युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सध्या शासनाने कंत्राटी पद्धतीने नौकर भरती सुरू केली आहे. त्यात प्रशासन मोठ्या प्रमाणात शोषण करत असल्याचं दिसून येतं आहे. नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना अवघ्या 5000 हजार रुपये मासिक मानधनावर शिक्षकाची नेमण्यात करण्यात आली असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्यामुळे उपास्या पोटी कशी विद्यार्थांच्या शिक्षणाची गुणवंता वाढेल??
राज्यात जिल्हा परिषद शाळेत हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोज बारा वाजले आहे. अनेक शाळा शिक्षक वीणा ओसाड पडल्या आहे. आणि शासनाची शिक्षक भरती बंद असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक कंत्राटी शिक्षक स्वयंसेवकांची भरती करण्याचा निर्णय नागपुर जिल्हा परिषदेने घेतला आहे. मात्र, रोजंदारीवरील मजुराच्या मासिक कमाईपेक्षाही कमी मानधनावर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे शिक्षक मिळणार कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यात अनेक वर्षांपासून शिक्षक भरती रखडली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची संख्या मोठी आहे. शासनाकडून शिक्षक भरतीचे अनेकदा आश्वासनही दिले जाते. मात्र, एकही शिक्षक नसल्याचे चित्र राज्यातील अनेक शाळांमध्ये आहे. नागपूर जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिकमध्ये 3500 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 75 शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेने अशा शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या शिक्षकांना केवळ 5000 हजार रुपये मानधन देण्याचे ठरवले आहे. हा शिक्षक स्वयंसेवक त्याच गावातील रहिवासी असावा, अशी अट घालण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे.16 हजार मानधनाचे काय?राज्य शासनाने कंत्राटी शिक्षकांना मासिक 16 हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करताना त्यांना हे मानधन दिले जात होते. मात्र, नागपूर जिल्हा परिषदेने त्यांच्या ‘सेस फंडा’तून 35 लाख रुपयांची तरतूद करून केवळ पाच हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय कुठल्या निकषांच्या आधारे घेतला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

