प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातून एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास शिकवणी वर्गासाठी घरून निघालेल्या 14 वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. कुणाल देवानंद भस्मे असे मृत्यक विद्यार्थ्याचे नाव असून तो हिंगणघाट शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील 8 वर्गात शिक्षण घेत होता.
हिंगणघाट तालुक्यातील आजती गावातील 14 वर्षीय विद्यार्थी कुणाल देवानंद भस्मे हा शिकवणी वर्गासाठी सायकल ने घरून निघाला हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्ग 44 वरील लक्ष्मी मंगल कार्यालय समोर येतात रस्ता पार करत असताना वाहनाने जोरदार धडक मारली त्यात कुणाल हा सायकल बरोबर रोडवर आदळला त्याला गंभिर जखमी स्थितीत परीसरातील नागरिकांनी उपचारासाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरानी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. ही घटना समोर येताच संपूर्ण आजांती गावात शोककळा पसरली आहे.

