Saturday, January 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याची शासनाने चौकशी केली का? आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला सवाल

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 2, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्याची शासनाने चौकशी केली का? आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला सवाल
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या अनुदानापासून दोन लाख शेतकरी वंचित

लाभार्थ्यांना मिळणाऱ्या कर्जमुक्तीच्या विलंबाची कारणे काय? सत्यजित तांबे यांचा सभागृहात सवाल

रूपसेन उमराणी मुंबई ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदानापासून दोन लाख शेतकरी अजूनही वंचित आहेत. तब्बल ७४० कोटी रुपयांच्या वितरणाला अद्याप वित्त विभागाने मान्यता दिली नसल्याने अजूनही प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार होते. मात्र ते शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही त्यामुळे या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे का? याबाबत सरकारने कोणती कार्यवाही व उपाययोजना केली अथवा करण्यात येत आहे? त्याच्या विलंबाची कारणे काय आहेत? असा सवाल आ. सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला.

सन २०१७ – २०१८, २०१८- २०१९ व २०१९- २०२० या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करुन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. मात्र राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांच्या तब्बल ७४० कोटी रुपयांच्या वितरणाला सरकारने अद्याप मान्यता दिली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान प्रलंबित आहे. या योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या नियम व अटी जाचक असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळत नाही. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात ७१,२१८ ऑनलाईन करण्यात आलेल्या कर्जखात्यांपैकी ३५,५०३ शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले व ३५७१५ कर्जखाती अनुदानापासून वंचित आहेत.

या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे का चौकशीच्या अनुषंगाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या नियम व अटी शिथील करून योजनेतील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना तसेच लाभार्थ्यांच्या वारसांना रुपये ५० हजार याबाबत कोणती कार्यवाही वा उपाययोजना केली वा करण्यात येत आहे? त्याच्या विलंबाची कारणे काय आहेत ? असा सवाल आ. सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनात उपस्थित केला.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 97664453487385445348

Previous Post

पेण ते भाल एसटी पुर्वरत सुरू करा, प्रवाशांना होणारा त्रास थांबवा शब्दभेदी सामाजिक संस्थेच्या मागणीला यश.

Next Post

सातपूर व अंबड परिसरातील औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या उद्योगांचे भूखंड अन्य कंपन्यांकडे हस्तांतरित करा: आ. सत्यजीत तांबे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सातपूर व अंबड परिसरातील औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या उद्योगांचे भूखंड अन्य कंपन्यांकडे हस्तांतरित करा: आ. सत्यजीत तांबे

सातपूर व अंबड परिसरातील औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या उद्योगांचे भूखंड अन्य कंपन्यांकडे हस्तांतरित करा: आ. सत्यजीत तांबे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In