युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हात गेल्या अनेक वर्षापासून कळमेश्वर ब्राह्मणी शहरातील नागरिकांकरिता शव वाहिनीचे नितांत गरज होती कळमेश्वर ब्राह्मणी पालिका हद्दीतील जवळपास 40 हजार लोकसंख्या असून ब्राह्मणी येथे स्मशानभूमीची योग्य व्यवस्था नसल्याने कळमेश्वर नागपूर मार्गावरील सुसज्ज स्मशान भूमी कडे जाण्याकरिता जवळपास तीन किलोमीरवर मृतकांच्या कुटुंबीयांना पायी जाव लागत लागते. त्यामुळे नागरिकाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने अनेकदा निवेदन दिली त्यात त्यांना यश येऊन अखेर स्वातंत्र्यदिनी नागरिकांच्या सेवेत शव वाहिनी दाखल झाली या शेववाहिचे थाटात लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कळमेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी रामेश्वर पडांगळे उपस्थित होते त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा बगडे, माजी नगरसेवक महादेव ईखार, प्राध्यापक हरिभाऊ शेंडे, मेघराज नवले, काशिनाथ चिमूरकर, मोहम्मद शेख, आराम धनगरे, अरुण धोटे, शेंडे, कृष्णा ज्ञानेश्वर गुंळादे, लता वैद्य,मनोहर राऊत, उमादेवी गौतम, पालिका कर्मचारी ओमकार घुमले, अनिल धोटे, विजय मस्के, पूजा जाधव, संतोष गुरवकर आदींची उपस्थिती होती

