आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील सेलू तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील हिंगणी गावात राहणाऱ्या 15 वर्षीय दोन शाळकरी विद्यार्थीनीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
हिंगणी गावात राहणाऱ्या 15 वर्षीय दोन शाळकरी विद्यार्थीनी शनिवारी शाळेत जाण्यासाठी घरून निघाल्या होत्या. त्या शाळेत गेल्यानंतर त्यांनी कागदपत्रे आणण्यासाठी सेलू येथे जायचे आहे असे शिक्षकाना सांगून त्या बाहेर निघाल्या. दिवसभर त्या कुठे होत्या याचा मागमूस लागला नाही. मात्र रात्री घरी परत न आल्याने त्यांची पालकांनी रात्रभर शोधाशोध केली अखेर पालकानी सेलू पोलीसांकडे धाव घेतली.
15 वर्षीय अल्पवयीन मुली गायब झाल्यामुळे या प्रकरणी संवेदनशिलता दाखवत मिळालेल्या माहितीच्या आधारावर तपास सुरू केला. त्यानंरत या अल्पवयीन दोन्ही मुली गडचिरोलीत येथे असल्याचे आढळून आले. पोलीस पथक नवेगाव गडचिरोली येथे पोहचले. स्थानिक चडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेवून आरोपी शुभम चुतरी वय 21 वर्ष यास ताब्यात घेतले. त्याच्याच घरी दोन्ही मुली आढळून आल्यात. ही कारवाई सेलु पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनंजय पांडे, पोलीस कर्मचारी अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, रुक्साना शेख यांनी ही कामगिरी फत्ते केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

