मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि. 21 सप्टेंबर:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक भारत चौधरी तसेच तालुका प्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी वर्धा यांना हिंगणघाट येथील महाराष्ट्र शासनामार्फत येणाऱ्या विकास निधी हा विशेष निधी म्हणून स्थानिक उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगणघाट तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगणघाट यांना प्राप्त होतो. प्राप्त झालेल्या त्या विशेष निधीचे ई- निविदा प्रक्रिया पूर्ण करून सदर बांधकामाचे कार्यारंभ आदेश बांधकाम ठेकेदाराला देऊन काम सुरू केल्या जाते. तत्पूर्वी त्या कामाचे भूमिपूजन सोहळा घेण्यात येतो. त्या भूमिपूजन फलकावर शासकीय नियमानुसार (प्रोटोकॉल) आमदार अभिजीत वंजारी तथा आमदार सुधाकर अडबाले विधान परिषद सदस्य- महाराष्ट्र शासन यांचे नावे त्या भूमिपूजन फलकावर हेतू पुरस्पर न टाकल्यामुळे शिवसेना वतीने निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनामार्फत पूर्ण राज्यभर 288 विधानसभा मतदारसंघात विशेष निधी म्हणून वितरित करण्यात आला. त्यानुसार हिंगणघाट मतदार संघात 3.5 कोटी मागील आघाडी सरकारचे व उर्वरित 18 ते 20 कोटी आता असलेल्या सरकारचे हे विशेष बाब म्हणून प्राप्त झाले.आणि हे निधी सर्व विधानसभा मतदार संघात देण्यात आले आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरपरिषद हिंगणघाट यांच्या कडून करून घेण्याचे ठरविले आहे. त्यांनी ई- निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला कार्यारंभ आदेश सहा महिन्या पूर्वी देऊन कामाची सुरुवात करण्यात आली.परंतु आमदार कुणावार यांना आपल्या नावाचे उदो उदो करण्याची सवय आहे म्हणून अधिकाऱ्यावर दबाव टाकून भूमिपूजन घेण्याचे आदेश दिले आहे.
भूमिपूजनाच्या सोहळा दिनांक २३ सप्टेंबर २०२३ ते ९ सप्टेंबर २०२३ पर्यन्त भाजपाच्या माध्यमातून इव्हेंट चालणार आहे जसे काही हा निधी भाजपाच्या कोषागार मधून दिल्याचे दाखवून हे सोंग करीत आहे आणि त्यांना शासकीय अधिकारी सहकार्य करीत आहे. त्या भूमिपूजन फलकावर एक विशेष आहे स्थानिक वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस तसेच आमदार समीर कुणावार व रामदास आंबटकर विधान परिषद सदस्य व त्या त्या वार्डातील भाजपाचे पदाधिकाऱ्यांचे नाव सुद्धा आहे, परंतु याच मतदारसंघातील शिक्षक आमदार सुधाकर अडबाले तथा पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांचे नाव नियमानुसार त्या भूमिपूजन फलकावर पाहिजे होते. परंतु स्थानिक आमदार समीर कुणावर यांच्या दबावात येऊन सदर एजन्सीज व अधिकाऱ्याने हे नावाला डावलण्यात आले आहे. यामुळे शिक्षक संघात आणि पदवीधर संघात मोठया प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे आणि म्हणून याबाबत आम्ही सदर एजन्सीस व अधिकाऱ्यांना मौखिक सूचना देऊन तथा लेखी सुद्धा देऊन याविषयी कळविले आहे. परंतु त्यावर कुठलीही कारवाई न करता सदर तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली.
त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी यांना विनंती केली की जर अभिजीत वंजारी व सुधाकर अडवाले विधान परिषद सदस्य असतील तर नियमानुसार त्यांची नावे या, भूमिपूजन फलकावर यायला पाहिजे. याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन देऊन करण्यात आली. निवेदन देताना उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, मनीष देवडे, शंकर मोहमारे, विजय कंगाले, निखिल श्रीरामे, शुभम नांवटकर इतर शिवसैनिक उपस्थित होते*.

