राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सध्या सर्वत्र न्युज चॅनल व प्रसार माध्यमांची गळचेपी सुरू आहे. त्यामुळे देशातील चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राना ट्रार्गेट करण्यात येत आहे. काही दिवसा अगोदर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या याच्या विकृतीचा पर्दाफाश करणाऱ्या ‘लोकशाही’ वृत्त वाहिनीची गळचेपी करण्याच्या राज्य गृह खात्याने चालवलेल्या कृतीचा भिवंडी महानगर पत्रकार संघाकडून निषेध करण्यात आला.
माजी खासदार किरीट सोमय्या याच्या व्हिडीओ प्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘लोकशाही’ वाहिनीला नोटीस बजावत 72 तासांसाठी बातम्यांचे प्रसारण बंद करण्याचे अजब आदेश दिले आहेत. हा आदेश म्हणजे प्रसार माध्यमांची सपशेल गळचेपी असून माध्यम स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा सरकारी डाव स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणात संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करत सरकारने पत्रकारांप्रती आपले धोरण उघड केले आहे.
या प्रकरणात प्रसारण मंत्रालयाकडून संपादकांना नोटीस देण्यात आली होती. या नोटीसला उत्तरही देण्यात आले होते. असे असतानाही नैसर्गिक न्यायाची बुज न राखता सोमय्या यांच्या विकृतीला खरे ठरवून वाहिनीचे प्रक्षेपण ७२ तास बंद ठेवण्याच्या सरकारी कारवाईचा भिवंडी महानगर पत्रकार संघ तीव्र धिक्कार करीत आहे. ‘लोकशाही’ वाहिनी आणि संपादक कमलेश सुतार यांच्या पाठीशी ठाम उभा आहे.

