हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मोब.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरातील राजेंद्र प्रसाद वार्ड येथील वाघमारे कुटुंबीयांच्या घरात रविवारी भरदिवसा मोठी चोरी झाली. अज्ञात आरोपींनी गेट उडी मारून घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटात ठेवलेले २५ तोळे सोन्याचे दागिने व १ लाख २० हजार रुपयांची रोकड असा सुमारे १३ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला.
या चोरीबाबत माहिती मिळताच बल्लारपूर चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी डॉग स्पॉट आणि बोट तज्ज्ञांना पाचारण केले. वृत लिहेपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.
प्राप्त माहितीनुसार, राजेंद्र प्रसाद वॉर्डातील केजीएन कॉन्व्हेंटजवळ राहणारे शिवम वाघमारे आणि त्याचा लहान भाऊ शुभम वाघमारे रविवारी सकाळी आपल्या कामावर गेले होते. त्यांची आई श्रीमती वाघमारे या राजुरा तालुक्यातील चिंचाळा जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असतात त्या गावी गेल्या होत्या. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सकाळी दहा ते दोनच्या दरम्यान मुख्य गेटवरून उडी मारून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी दोन कपाटात ठेवलेले सुमारे २५ तोळे सोन्याचे दागिने व १ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरून पळ काढला. या चोरट्यांनी घरातील इतर कोणत्याही वस्तूला हातही लावला नाही. काही लहान मुलांनी एका तरुणाला बाहेर उभं राहून निरीक्षण करताना पाहिलं असल्याचं सांगण्यात येत आहे. पण आत काय चाललंय याची त्यांना कल्पना नव्हती.
दुपारी अडीच वाजता शुभम वाघमारे कामावरून परतला असता घरात चोरी झाल्याचे त्याला समजले. त्यांच्या तक्रारीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांचे पथक चोरट्यांचा शोध घेत आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्य मार्गावर असलेले अरुण वाघमारे किराणा दुकान, गजानन सुपर मार्केट, समाधान पूर्ती सुपर मार्केट आणि मेडिकलमधील चोरटे अद्यापही बल्लारपूर पोलिसांना गवसले नाही.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

