उषाताई कांबळे, प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- वंचित बहुजन आघाडीला “इंडिया आघाडीत” निमंत्रण न मिळाल्याने काँग्रेस सह मित्र पक्षावर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली की, काँग्रेसला वंचित बरोबर आघाडी करण्यात रस आहे का? काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना पाठवलेल्या पत्राच्या उत्तराची प्रतीक्षा ॲड. प्रकाश आंबेडकर करत आहेत; उत्तर देण्यासाठी आणखी 7 दिवस; अन्यथा सर्व 48 जागांवर निवडणूक लढवू. असे प्रेस रिलिज म्हणून म्हटले आहे.
१ सप्टेंबर २०२३, शुक्रवार रोजी, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक ई-मेल लिहिला जेव्हा काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी तिसर्या “इंडिया” बैठकीसाठी मुंबईत होते.
ई-मेल त्यांना दोन प्रमुख कारणांसाठी लिहिला होता. एक म्हणजे मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण पाठवले असल्याच्या त्यावेळच्या अफवा खोडून काढण्यासाठी काँग्रेसला विनंती करणे आणि दुसरे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे खुले आहेत हे सांगणे.
“आज भाजप – आरएसएस देशाला बरबाद करता आहेत. जर इंडिया आघाडी भाजप – आरएसएस च्या फुटीरवादी विचारसरणी आणि राजकारणाशी लढण्यास खरोखरच गंभीर असेल, तर प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणे काँग्रेसचे कर्तव्य आहे. परत एकदा सांगतो, आमचे दरवाजे खुले आहेत”, असे तेलंग यांनी लिहिलेल्या ई-मेलच्या समारोपाच्या परिच्छेदात म्हटले आहे.
ई-मेल पाठवून आणि तेलंग यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर सार्वजनिक करून जवळपास एक महिना झाला आहे, परंतु काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा इंडिया आघाडी मधील त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही.
वंचित बहुजन आघाडीला हे जाणून घ्यायचे आहे की आम्हाला कधीतरी उत्तर मिळणार आहे का. मिळणार नसेल तर काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावे की, काँग्रेसला वंचित आणि बहुजनांना आघाडीत सहभागी का करून घ्यायचे नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आणि 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 6.98 आणि 5.57 टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीचे आमंत्रण का पाठवले गेले नाही किंवा सामील केले गेले नाही याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. 2019 पासून ज्या पक्षाची लोकप्रियता आणि मतदारांची संख्या वाढली आहे तो पक्ष युतीत का नाही याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. प्रामुख्याने, काँग्रेस ने त्यांच्याकडून चालवल्या जाणार्या सर्व खोट्या बातम्या आणि खोट्या कथा तसेच सोशल मीडियावर नव्याने कामाला लावलेल्या ट्रोल्सकडून वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण मिळाले आणि त्यांनी ते नाकारले हा खोटारडेपणा थांबवला पाहिजे.
जर काँग्रेसला आमच्या ई-मेलला उत्तर द्यायचे असेल आणि वंचित बहुजन आघाडी सह युती करायची असेल तर ते पुढील 7 दिवसांत उत्तर देऊ शकतात. अन्यथा, आम्ही सर्व 48 जागा लढवण्याच्या आमच्या योजनेनुसार पुढे जाऊ, कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व 48 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या मार्गावर आहोत. असे सिद्धार्थ मोकळे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी यांनी महाराष्ट्र संदेश न्युज ला दिलेल्या प्रेस रिलिज म्हणून म्हटले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

