उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन शिराळा:- येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन तथागत ग्रुपचे मार्गदर्शक संस्थापक संदिप गवई आणि तथागत ग्रुपचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी शिराळा येथे महात्मा गांधींजी यांना अभिवादन केले.
यावेळी म्हणाले तथागत ग्रुपचे अध्यक्ष अविनाश कांबळे महात्मा गांधीजींनी ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली. खरा भारत गावागावात, खेड्यापाड्यात वसला आहे, हे जाणून ‘खेड्याकडे चला’ अशी हाक देऊन. वर्ध्या जवळ ‘ सेगाव’ हे गांधीजींनी आपल्या वास्तव्यासाठी निवडले. सेगाव कालांतराने ‘सेवाग्राम’ म्हणजेच सेवेचे गाव झाले. सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींजी यांची साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्वावरील जीवन शैलीचे दर्शन घडते, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण मानवजातीसाठी दिलेला सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश सर्वांना कायम प्रेरणा देणारा आहे,स्वतःचे संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केलेले, जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचे सर्वधर्म समभाव, विश्वबंधुता, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, पर्यावरण या बहुविध विषयांवरील विचार आजच्या काळातही समर्पक आणि मार्गदर्शक आहेत. भविष्यात सुध्दा त्यांच्या विचारांवर पिढ्यानपिढ्या मार्गक्रमण करत राहतील त्याच्या विचाराणे समाधान व ऊर्जा मिळाते, सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या या दोन्ही महान विभूतींचे आचार विचार कायम प्रेरणादायी आहेत असे तथागत ग्रुपचे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी सांगितले.
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अविनाश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संजय चव्हाण, उपसरपंच प्रकाश जाधव, तंटामुक्त अध्यक्ष. शिताराम पाटिल, सोसायटी चेरमन गोरक काटकर, नत्थु कदम, संजय कांबळे, डी एम बापू, उत्तम चव्हाण इत्यादी ग्रामस्थ व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

