देवेंद्र सिरसाट हिंगणा (नागपुर) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन नागपूर:- भारत राष्ट्र समिती हिंगणा विधानसभा क्षेत्रा तर्फे एक दिवसीय धरणा आंदोलन करण्यात आले. नियमित चालणारे उद्योग, व्यापार, हॉस्पिटल, संस्था, कंट्रक्शन कामगार आणि कर्मचारी हा वर्ग अधिक प्रमाणात ओबीसी, एससी, एसटी, व्हिजेएनटी समाजातून निघालेला कामगार वर्ग आहे. मागील दोन हजार वर्षापासून आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक पासून वंचित आहे, आणि मागासलेला वर्ग आहे. यांच्या प्रगती करिता भारतीय संविधानामध्ये आरक्षण दिले आहे मागील काही वर्षा पासून खाजगीकरण केल्यामुळे आरक्षण संपल्या सारखे आहे.
सरकारच्या खाजगीकरण नीतीने ठेकेदारांच्या फायदा करिता जन्म दिला, आज अशी परिस्थिती झाली आहे जो ठेकेदार आहे मजूर कामगारा कडून आठ तासापेक्षा बारा तास काम घेऊन त्याचे शोषण करीत आहे. म्हणूनच जर ठेकेदारी पद्धती बंद केली त्यांच्या मनमानीवर आळा घातला तर निश्चितच रोजगार हा पूर्णपणे मिळू शकेल आणि कामगाराला गुलामी पासून मुक्ती मिळेल, या बाबतचे निवेदन भारत राष्ट्र समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंगणा तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर मार्फत पाठविले आहे.
या आंदोलनामध्ये हिंगणा विधानसभा क्षेत्र समन्वयक ॲड. रमेश सिन्हा, सहसमन्वयक नानाभाऊ चव्हाण, बीआरएस पदाधिकारी साहिल बाभुळकर, महेंद्र यादव, प्रज्वल दुपारे अनिकेत हजारे, वामनराव ऊके, ॲड. बोन्दीले, भारत सहारे, केशव डोंगरे, सागर पडोले इत्यादी भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

