🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा, दि.18 : प्रशासनाच्या प्रत्येक विभागांनी कायदयाच्या चौकोटीत राहून कामे करावी मात्र शासननिर्णय लोकोपयोगी नसल्यास यामध्ये बदल करण्याची तरतुद करता येते. यासाठी विशेष बाब म्हणुन काम करता येते. विकास कामे करीत असतांना कामाच्या दर्जा सोबत कामामध्ये पारदर्शकता व गती असावी, अशा सुचना वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध विभागाच्या कामाचा आढावा बैठकीत केल्या. जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृह येथे विविध विभागाचा आढावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खा. रामदास तडस, आ. समिर कुणावार, आ.दादाराव केचे, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन, उपवन संरक्षक राकेश सेपट आदी उपस्थित होते.
विकास कामांमध्ये पारदर्शकता, माहिती अधिकार कायदा, नस्ती निपटारा कायदा कामांमध्ये लोभ ठेऊन आकसपणाची भुमिका न ठेवता या बाबीवर कामे करावी. शिक्षण हे सर्व समाजाच्या प्रगतीचा पाया असून समाजातील प्रत्येक घटकांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरी असून यासाठी कृषि क्षेत्रात आमुलाग्र बदल आणण्याची गरज असून यासाठी शासन शेतक-यांची विविध योजना राबवित असून या योजनांच्या माध्यमातून शेतक-यांना आधुनिक तत्रज्ञांनाचा वापर करुन कृषि क्षेत्रात बदल घडविण्यासाठी प्रशासनानी सहकार्य करावे.
यासाठी कृषि विभागांनी 5 दिवसाचे कृषि प्रदर्शनीचे आयोजन असावे. यामध्ये शेद्रींय शेती, कृषि प्रक्रिया उद्योग, शेतकरी प्रशिक्षण, पॉली हाऊस, कृषी वाचनालय, दुग्ध योजना, वनशेती, माती परिक्षण, ड्रोन फवारणी याबाबत जनजागृती असावी. शासनाने निराधार योजनेच्या अनुदानात वाढ केली असून त्यांना 120 दिवसात अनुदान देने अपेक्षित असतांना देण्यास दिरंगाई होत आहे. यासाठी जिल्हाधिका-यांनी बैठक घेऊन अनुदान वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी लक्ष दयावे. तसेच केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनाचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे. जिल्ह्यातील जीर्ण अवस्थेत असलेल्या शासकीय रुग्णालयाचे बांधकामासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करण्या सोबतच रुग्णालयांमध्ये पर्याप्त प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा, तसेच रुग्णालयातील स्वच्छता, पाणी, रुग्णांसाठी व्यवस्थीत बैठक व्यवस्था यावर यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
पादंन रस्ते, खनिज विकास निधी, रोहयोच्या कामासाठी स्थानिक प्रतिनिधी चर्चा करुन कामे वितरीत करावी. यावेळी आ. समीर कुणावार यांनी काही प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थानांतरण, जीर्ण झालेल्या आरोग्य केद्राच्या इमारतीचे बांधकाम करणे, नव्याने बांधन्यात आलेल्या नगर परिषद इमारतीसाठी फर्णीचरकरीता निधीची मागणी, शेतक-यांनी दिवसा विज देण्याची मागणी यावेळी केली. तसेच हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचा श्रेणी वाढ करण्याबाबत मागणी केली. आ. दादाराव केचे यांनी आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील नदी काठावरील गावाच्या पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी मागणी करुन आरोग्य केंद्रातील रिक्त्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांची पदे तातडिने भरण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. तर आ. डॉ. पंकज भोयर यांनी बोर प्रकल्प, धाम प्रकल्पाची क्षमता वाढविणे, गेल्या कित्येक वर्षापासुन शहरामध्ये जागेअभाव सांस्कृतिक भवन तयार करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचा प्रश्न उपस्थित केला. बैठकीला सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

