अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं – 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 1 डिसेंबर:- मागील आठवड्यात नागपुर जिल्हात विविध भागांत पडलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच भंबेरी उडाली आहे. या पावसाचा कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असून भाजीपाल्यासह पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेल्या आहे.
नागपूर जिल्हातील सावनेर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतीतील पीक पाण्यात भिजून गेला आहे. त्यात ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे सावनेर तालुक्यात उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पिके जमीनधोस्त झालेली आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या भागात तात्काळ मध्ये सर्वे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतिने राज्य सरकारला करण्यात आली आहे.
या आशियाचे निवेदन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख रामटेक विभाग नागपूर ग्रामीण नेते उत्तम कापसे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी संपतजी खलाटे सावनेर यांना देण्यात आलेले आहे.
याप्रसंगी कपिल पांडे, प्रफुल नारनवरे, सुनील धोटे, मनोज पोपटे, अमित पांडे, बेनीराम सूर्यवंशी, देवेंद्र बभुरे, राजबहादुर सिंग इत्यादी पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

