उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची बुधवारी दिनाक 29 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम सांगली येथे लाखो लोकांच्या उपस्थितीत सत्ता संपादन निर्धार सभा संपन्न झाली.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे म्हणाले मंडल आयोगाला विरोध होत असताना भुजबळ कोठे होते महाज्योतीला निधी मिळत नाही त्यावर भुजबळ बोलत नाहीत ओबीसी ला न्याय देणेच काम ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
यावेळी जयसिंग शेडगे बापू म्हणाले धनगर समाजाला एसटी चे आरक्षण देणेच अधिकार केंद्र सरकारला आहे त्यासाठी आपला खासदार दिल्लीत जाने महत्वाचे आहे.
राज्य प्रवक्ते इम्तियाज नदाफ म्हणाले वंचित बहुजन आघाडी हा..24. कॅरेट धर्मनिरपेक्ष पक्ष आहे सर्व धर्म निरपेक्ष मतदार एकत्र येण्यासाठी मुस्लिम बांधवांनी काम करावं.
यावेळी मार्गदर्शन करताना दीशा पिंकी शेख म्हणाल्या की, देशात खाजगीकरन सुरू केलं आहे जर खाजगी कंपन्या आल्या तर आरक्षणाच लोनच घालणार काय असा सवाल करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले दहा वर्षात 14 लाख कुटुब परदेशात देशाला हिंदू राष्ट्र करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. 2014 ते 2023 या काळात 14 कुटुंब परदेशात गेले आहेत 1950 ते 2014 या काळात 7644 भारतीय कुटुबियाणी परदेशी नागरिकत्व स्वीकारलं आहे. हिंदू राष्ट्राच्या नावाखाली लुटमार सुरू आहे. त्याच्या विचाराशी सहमत झालो नाही तर इडी येईल आणि आम्हाला अटक होईल अशी त्या लोकांची भावना आहे आणि त्यामुळे लोक देश सोडून जात आहेत आणि हे जर पुन्हा सत्तेत आले तर 64 आकडा एक कोटी वर जाईल असा आपेक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
यावेळी अँड. प्रकाश आंबेडकर भाषण करीत असताना पावसाने जोरदार हजेरी लावली त्यात ही त्यांनी काही वेळ भाषण सुरूच ठेवलं मोठ्या संख्येनी जमलेल लोक पावसात खुर्च्या डोकी वर घेऊन भाषण ऐकत होते मात्र पावसाचा जोर वाढल्याने प्रकाश आंबेडकरांनी भाषण आटोपते घेत या सभेत युवक प्रदेश अध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी, अमोल लांडगे क्रांती सावंत, नितीन सोनवणे, सादिक शेख, सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे सह हजारो नागरिक, महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.

