प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सिंदी रेल्वे येथे मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून एका 15 वर्षिय अल्पवयीन मुलीने स्नानगृहात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शहरातील चिचघाटपूरा येथे घडली. श्रावणी रायभान मसराम असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार रोजप्रमाणे मसराम हे कुटुंब रात्री जेवणासाठी बसले होते. जेवण झाल्यावर श्रावणीने आईला खर्रा खाण्यासाठी 20 रुपये दे, नाहीतर मोबाईल घेऊन दे, असे म्हणत मोबाईल घेऊन देण्यासाठी तगादा लावला. घरी पैसे नसल्याने नंतर मोबाईल घेऊ, असे तिच्या आईने श्रावणीस सांगितले. मात्र, श्रावणीने ऐकले नाही. मोबाईल घेऊन देण्यासाठी लावलेल्या तगाद्याने संतापलेली श्रावणीची आई तिच्यावर रागावली होती. परिणामी, रात्री 10.00 वाजताच्या सुमारास लघुशंकेसाठी गेली असता श्रावणीने ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर वडिल लघुशंकेसाठी उठले असता आवाज देवूनही बाथरूमचे दार उघडत नसल्याने दाराचा कोंडा तोडून दार उघडले असता मुलगी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली.
तडकाफडकी या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आपल्या ताप्यासह घटनास्थळी दाखल झाली. यावेळी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात. याप्रकरणी सिंदी (रेल्वे) पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुधील तपास सुरू केला आहे.

