मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जवळ एका भीषण अपघातात तीन युवकांच्या दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतक तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
9 जानेवारी रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास अक्षय, अजित आणि अमोल नुकत्याच घेतलेल्या नवीन दुचाकी मोटर सायकल वरून भरधावं वेगाने गडचिरोली च्या दिशेने येत असताना मुरखळा गावाजवळच्या वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी आदळली असता त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी चे दोन तुकडे झाले हे मृत तीनही तरुण अहेरी तालुक्यातील गोविन्द गावांतील असल्यामूळे पूर्ण गावावरच शोककळा पसरली होती.
या घटनेची माहिती मिळताच आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत हे गोविन्दगाव गाठून मृतकाच्या घरी जाऊन सांत्वना भेट दिली. त्यावेळी सोबतीला देवेंद्र खतवार, संदीप चंदावार मुन्ना झाडे व ईतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

