Monday, December 8, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

झिंगानुर, आसरलली, जारावडी, कसनसुर परीसरात BSNL स्विच ऑफ, नागरिक मोबाईल नेटवर्क मुळे त्रस्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 13, 2024
in Uncategorized
0 0
0
झिंगानुर, आसरलली, जारावडी, कसनसुर परीसरात BSNL स्विच ऑफ, नागरिक मोबाईल नेटवर्क मुळे त्रस्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अहेरी उपविभागात मोबाईल सेवा सुरळीत करा :संदीप कोरेत

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी :- उपविभागात एटापल्ली तालुक्यातील जारावांडी कसनसुर सह सिरोंच तालुक्यातील झिंगाणुर आसरलली अहेरी तालुक्यातील दामरंचा देचलि पेठा व मलचेरा तसेच भामरागड तालुक्यातील बहुतांश अतिदुर्गम भागात मोबाईल सेवा सुरळीत करा अशी मागणी निवेदनाद्वारे आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत यांनी खासदार अशोक नेते तसेच जिल्हा दूरसंचार अधिकारी गडचिरोली यांना करण्यात आले आहे.

बीएसएनएल सेवा गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बंद झाली असून त्यामुळे या सेवेवर अवलंबून असलेली ब्रॉडबँड सेवा बंद असल्याने बँकेच्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे. मोबाईल सेवेसह दूरध्वनी सेवाही ठप्प झाल्याने उपविभागातील समस्या युक्त गावातील जनतेचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

उपविभागातील ग्रामीण भागात हजारोच्या संख्येने बीएसएनएलचे दूरध्वनी ग्राहक आहेत बीएसएनएलच्या कनेक्टीव्हीटी अभावी मोबाईल धारकांना फोन सतत आऊट ऑफ रेंज असल्याचा अनुभव येत आहे. रेंज मिळालीच तर क्रॉस कनेक्शन लागते व आवाजही स्पष्ट येत नाही त्यामुळे मोबाईल धारक हेरान झाले आहेत तसेच कार्यालयीन कामकाज ठप्प पडल्यामुळे जनतेच्या अत्यावश्यक गरजा प्रभावित झाल्या आहेत. तसेच विद्याथ्र्याचे दाखले, ऑनलाईन अर्ज, शासकीय योजनांची माहिती, विद्यार्थी पोर्टलवरील माहिती भरणे या सर्व गोष्टींवर परिणाम झाला असून याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याने जनतेत या विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व विविध शासकीय दाखले ऑनलाईन मिळत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकाना तालुका मुख्यालयी यावे लागत आहे. ग्रामीण भागात कनेक्टीव्हीटी अभावी कामे होत नसल्याने त्यांना दररोज तालुका मुख्यालयी चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना प्रवासाचा आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.

त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत असून 15 ते 20 दिवसांपासून सेवा बंद असूनही वरिष्ठ लक्ष देत नसल्याने जनतेने तक्रार कुठे करावी? असा प्रतिप्रश्न जनतेतून उपस्थीत होत आहे. त्यामुळें वरिष्ठांनी विषयाचे गांभीर्य ओळखून स्वतःह लक्ष घालून मोबाईल सेवा सुरळीत करा अशी मागणी निवेदनाद्वारे आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ कोरेत यांनी खासदार अशोक नेते तसेच जिल्हा दूरसंचार अधिकारि, भारत संचार निगम लिमिटेड गडचिरोली यांना केली आहे तेव्हां सोबत उपस्थीत विजय नल्लावारजिल्हा सचिव भाजपा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

वर्षा कोयचाळे बॉक्सिंग रेफरी बेस्ट जज् म्हणून सन्मानीत.

Next Post

भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते महागाव खुर्द येथे विकास कामांचे भूमिपूजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते महागाव खुर्द येथे विकास कामांचे भूमिपूजन.

भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते महागाव खुर्द येथे विकास कामांचे भूमिपूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In